शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

Uttar Pradesh Election 2022: अवघ्या २४ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री; १९९३ पासून आतापर्यंत आमदार, कोण आहे राजा भैय्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:10 IST

रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९६७ मध्ये प्रतापगड येथील भदरी येथे झाला

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्व पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. अशावेळी प्रचाराच्या रणांगणात दबंग नेत्यांची कमी नाही. जे त्यांच्या प्रतिमेमुळे निवडणुकीत प्रभाव पाडतात. त्यात एक नाव म्हणजे माजी कॅबिनेट मंत्री रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या, ज्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत बाजी मारली.

रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९६७ मध्ये प्रतापगड येथील भदरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उदय प्रताप सिंह आणि आईचं नाव मंजुल राजे होतं. त्यांची आईही राज घराण्यातून आहे. राज भैय्याला तूफान सिंह नावानंही ओळखलं जातं. त्यांना घोडेस्वारीचा नाद आहे. एकदा घोड्यावरुन पडलेल्या त्यांना मोठी दुखापत झाली होती. त्याशिवाय बुलेट आणि जिप्सी चालवण्यासह हेलिकॉप्टरनं प्रवास करणं हा त्यांचा छंद आहे. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत राजा भैय्या यांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते सातत्याने आमदार आहेत.

एकेकाळी मुलायम सिंह यादव यांनी रघुराज प्रताप सिंह यांच्यावर दंगलीत सहभागी असल्याचा आरोप केला होता. राजा भैय्या त्यांचे वडील उदय प्रताप सिंह यांना खूप घाबरतात. लहानपणी त्यांनी वडिलांच्या नजरेला नजर मिळवली नाही. राजा भैय्याकडे जवळपास २०० कोटींहून अधिक संपत्ती आहे. एकदा यूपीत विधानसभा निवडणुकीत राजा भैय्याविरोधात प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह स्वत: पोहचले होते. मात्र तरीही याठिकाणी भाजपाचा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता.

त्यानंतर राजा भैय्या यांना गुंडा म्हणून संबोधणारे कल्याण सिंह यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात राजा भैय्याचा समावेश केला. राजा भैय्या यांनीही प्रामाणिकपणे काम केले. जेव्हा बसपा सुप्रीमो मायावती यांनी तत्कालीन भाजपा सरकारचं समर्थन मागे घेतले तेव्हा राजा भैय्याने सरकार वाचवण्यासाठी कल्याण सिंह यांची खूप मदत केली. मात्र त्यानंतर बसपा सरकार आलं आणि राजा भैय्या यांच्यावर पोटा कायद्यातंर्गत कारवाई केली. त्यांना जेलमध्ये पाठवलं. २००३ मध्ये मायावती सरकारने भदरी येथील राजा भैय्या यांच्या वडिलांच्या महालावर छापेमारी केली.

२०१२ मध्ये समाजवादी पक्षाचं सरकार बनलं. राजा भैय्या यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. परंतु त्यावेळी प्रतापगडच्या कुंडा येथे हायप्रोफाईल मर्डर झाला. ज्यात डिप्टी एसपी जिया उल हक यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात राजा भैय्या यांचे नाव आले. ज्यामुळे अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली. त्यानंतर राजा भैय्याला क्लीनचीट मिळाली. तेव्हा ८ महिन्यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात राजा भैय्याचा समावेश झाला. राजा भैय्या यांच्यावर अनेक खूनाचे आरोप आहेत.

यंदाच्या निवडणुकीत राजा भैय्या यांनी स्वत:चा पक्ष बनवला आहे. ज्याचं नाव जनसत्ता दल लोकतांत्रिक असं ठेवलंय. त्यांच्या नव्या पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोगाने करवत दिली आहे. आता या निवडणुकीत राजा भैय्याचा पक्ष काय कमाल दाखवतो ते पाहणं गरजेचे आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा