शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या झाल्या; भाजपा कार्यकर्ते कार्यक्रमातून निघून गेले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 08:49 IST

वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाच्या मैदानावर ३ हजार ३६१ बूथ म्हणून २० हजारांहून अधिक भाजपाचे बूथ पदाधिकारी पोहचले होते.

वाराणसी – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाची लाट देशभर पसरली आणि केंद्रात सत्ता परिवर्तन झालं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सत्तेत आले. मोदी यांच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. मात्र आता ७ वर्षानंतर चित्र पालटल्यासारखं दिसत आहे. वाराणसी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत असताना याठिकाणी अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं. इतकचं नाही तर मोदी भाषण करतानाही अनेकजण निघून जात होते. मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात बूथ विजय संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात हा प्रकार घडला.

वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाच्या मैदानावर ३ हजार ३६१ बूथ म्हणून २० हजारांहून अधिक भाजपाचे बूथ पदाधिकारी पोहचले होते. ते सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत होते. परंतु मोदी यांचे भाषण सुरु होताच अनेकजण खुर्ची सोडून जाताना दिसले. बूथ विजय संमेलनात भाजपा पदाधिकाऱ्यांना मोदी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचं मंत्र देत होते. परंतु हा कार्यक्रम अर्धा तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते वाट पाहून थकले होते. त्यामुळे जेव्हा मोदींचे भाषण सुरू झाले तेव्हा ते अर्धवट सोडून अनेकजण माघारी परतले.

भाषण सोडून जाणाऱ्या लोकांना कारणं विचारली तेव्हा काहींनी मजबुरीनं अनेक बहाणे दिले. बूथ पदाधिकारी सन्नी सिंह म्हणाले की, त्यांना एका मिटींगला जायचे आहे. उशीर होईल म्हणून जातोय. तर बूथ अध्यक्ष हरिवंश सिंह यांनी कार्यक्रमातून जात नाही. मोदींचे भाषण चालता-फिरता ऐकत असल्याचं सांगितले. OBC मोर्चाचे अध्यक्ष सोमनाथ मौर्य भाषणावेळी बाहेर जात असताना दिसल्यावर म्हणाले की, सुरुवातीला कार्यक्रमाला गर्दी होती. १२ वाजल्यापासून लोकांनी काही खायलं-प्यायलं नाही. खुर्च्या खाली झाल्या नाहीत. काहीजण लघुशंकेला बाहेर गेलेत. कार्यक्रम संपत आल्याने बाहेर जात असल्याचं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत भाजपाच्या मंडल अध्यक्ष मोनिका पांडेय यांनीही मोदींचे भाषण सुरू असताना कार्यक्रमातून बाहेर पडल्या. तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले असता मुलीची परीक्षा आहे. तिला गेटपर्यंत सोडण्यासाठी जात आहे. कार्यक्रम सोडून जात नाही तर पुन्हा येणार असल्याचं म्हणाल्या. तर मोदींच्या भाषणाचा शेवट आल्याने लोकं बाहेर पडत आहेत. मोदींनी दिलेला विजयाचा कानमंत्र सर्वजण अंमलात आणतील असं सांगत भाजपा बूथ पदाधिकारी राहुल मिश्रा यांनी सारवासारव केली.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा