शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:30 IST

योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं.

नुकतेच पाच राज्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली. उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपनं सरकार स्थापन केलं आहे. परंतु योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं.

"योगी आदित्यनाथ यांचा विजय हा जातीयवादाचा विजय आहे. ध्रुवीकरण ही गेल्या २० वर्षांपासून निवडणुकीची खेळी आहे. परिस्थिती अशी आहे की दोन मुलेही समोरासमोर भांडली तरी त्याला ध्रुवीकरण म्हणतात," असं कुरैशी म्हणाले. दैनिक भास्करला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

"फाळणीच्या वेळी जास्तीत जास्त ध्रुवीकरण झालं. मग बाबरीच्या वेळी आणि आत्ताचा हा देशातील ध्रुवीकरणाचा तिसरा टप्पा आहे. देशातील जनतेला तेजीनं जातीयवादी केलं जाक आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे कारण हिंदु धर्मनिरपेक्ष आहे. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान हा मुस्लिम देश झाला, पण भारत हा हिंदू राष्ट्र न होता धर्मनिरपेक्ष देश झाला. मग सर्व काही सामान्य झालं. आताचीही वेळ निघून जाईल अशी मी अपेक्षा करतो," असंही ते म्हणाले.

"मी EVM समर्थक पण...""मी ईव्हीएमचा समर्थक आहे. परंतु पोस्टल आणि ईव्हीएमचे निकाल कायमच वेगळे असतात. पोस्टल मतं कायमच भाजपच्या बाजूने जातात. ईव्हीएममध्ये जर गडबड झाली असती तर बंगालची निवडणूक भाजप हरली नसती, यासाठी मी ईव्हीएमला भरवशाचं मानतो. भाजपनं बंगालमध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती. बॅलेटवर पुन्हा येण्याचा कोणताही प्रश्नच नाही. जर अजून पुष्टी करायची असेल तर VVPAT मोजून घ्यावं," असंही ते म्हणाले.

"निवडणुक आयोगावरील भरवसा कमी झाला"यावेळी कुरैशी यांना निवडणूक आयोगावरी भरवसा कमी झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. "हो, दुर्देव आहे पण खरं आहे. देशाला निवडणूक आयोगावर खुप भरवसा होता. मला असं बोलण्यात खुप दु:ख होतं. मी यावर काही बोलू इच्छित नाही. मी माझ्या नंतरच्या लोकांबद्दल वाईट बोलतोय असं वाटेल. याचं कारण तिथली लोकं आहे. काही शेषन यांच्यासारखे कठोर लोक सापडतील, तर काही कमकुवत आणि काही चमचेगिरी करणारे सापडतील," असंही कुरैशी म्हणाले.

"यासाठी नियुक्तीची पद्धत कॉलेजियम सिस्टम प्रमाणे बदलायला हवी. निवडणूक आयोगात जे धाडस होते त्यावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुणी त्याच्याकडे बोट दाखवलं तर मला वेदना होतात, कुणीतरी मला कानशिलात लगावतंय असं वाटतं," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग