शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:30 IST

योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं.

नुकतेच पाच राज्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली. उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपनं सरकार स्थापन केलं आहे. परंतु योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं.

"योगी आदित्यनाथ यांचा विजय हा जातीयवादाचा विजय आहे. ध्रुवीकरण ही गेल्या २० वर्षांपासून निवडणुकीची खेळी आहे. परिस्थिती अशी आहे की दोन मुलेही समोरासमोर भांडली तरी त्याला ध्रुवीकरण म्हणतात," असं कुरैशी म्हणाले. दैनिक भास्करला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

"फाळणीच्या वेळी जास्तीत जास्त ध्रुवीकरण झालं. मग बाबरीच्या वेळी आणि आत्ताचा हा देशातील ध्रुवीकरणाचा तिसरा टप्पा आहे. देशातील जनतेला तेजीनं जातीयवादी केलं जाक आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे कारण हिंदु धर्मनिरपेक्ष आहे. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान हा मुस्लिम देश झाला, पण भारत हा हिंदू राष्ट्र न होता धर्मनिरपेक्ष देश झाला. मग सर्व काही सामान्य झालं. आताचीही वेळ निघून जाईल अशी मी अपेक्षा करतो," असंही ते म्हणाले.

"मी EVM समर्थक पण...""मी ईव्हीएमचा समर्थक आहे. परंतु पोस्टल आणि ईव्हीएमचे निकाल कायमच वेगळे असतात. पोस्टल मतं कायमच भाजपच्या बाजूने जातात. ईव्हीएममध्ये जर गडबड झाली असती तर बंगालची निवडणूक भाजप हरली नसती, यासाठी मी ईव्हीएमला भरवशाचं मानतो. भाजपनं बंगालमध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती. बॅलेटवर पुन्हा येण्याचा कोणताही प्रश्नच नाही. जर अजून पुष्टी करायची असेल तर VVPAT मोजून घ्यावं," असंही ते म्हणाले.

"निवडणुक आयोगावरील भरवसा कमी झाला"यावेळी कुरैशी यांना निवडणूक आयोगावरी भरवसा कमी झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. "हो, दुर्देव आहे पण खरं आहे. देशाला निवडणूक आयोगावर खुप भरवसा होता. मला असं बोलण्यात खुप दु:ख होतं. मी यावर काही बोलू इच्छित नाही. मी माझ्या नंतरच्या लोकांबद्दल वाईट बोलतोय असं वाटेल. याचं कारण तिथली लोकं आहे. काही शेषन यांच्यासारखे कठोर लोक सापडतील, तर काही कमकुवत आणि काही चमचेगिरी करणारे सापडतील," असंही कुरैशी म्हणाले.

"यासाठी नियुक्तीची पद्धत कॉलेजियम सिस्टम प्रमाणे बदलायला हवी. निवडणूक आयोगात जे धाडस होते त्यावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुणी त्याच्याकडे बोट दाखवलं तर मला वेदना होतात, कुणीतरी मला कानशिलात लगावतंय असं वाटतं," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग