शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:30 IST

योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं.

नुकतेच पाच राज्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली. उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपनं सरकार स्थापन केलं आहे. परंतु योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं.

"योगी आदित्यनाथ यांचा विजय हा जातीयवादाचा विजय आहे. ध्रुवीकरण ही गेल्या २० वर्षांपासून निवडणुकीची खेळी आहे. परिस्थिती अशी आहे की दोन मुलेही समोरासमोर भांडली तरी त्याला ध्रुवीकरण म्हणतात," असं कुरैशी म्हणाले. दैनिक भास्करला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

"फाळणीच्या वेळी जास्तीत जास्त ध्रुवीकरण झालं. मग बाबरीच्या वेळी आणि आत्ताचा हा देशातील ध्रुवीकरणाचा तिसरा टप्पा आहे. देशातील जनतेला तेजीनं जातीयवादी केलं जाक आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे कारण हिंदु धर्मनिरपेक्ष आहे. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान हा मुस्लिम देश झाला, पण भारत हा हिंदू राष्ट्र न होता धर्मनिरपेक्ष देश झाला. मग सर्व काही सामान्य झालं. आताचीही वेळ निघून जाईल अशी मी अपेक्षा करतो," असंही ते म्हणाले.

"मी EVM समर्थक पण...""मी ईव्हीएमचा समर्थक आहे. परंतु पोस्टल आणि ईव्हीएमचे निकाल कायमच वेगळे असतात. पोस्टल मतं कायमच भाजपच्या बाजूने जातात. ईव्हीएममध्ये जर गडबड झाली असती तर बंगालची निवडणूक भाजप हरली नसती, यासाठी मी ईव्हीएमला भरवशाचं मानतो. भाजपनं बंगालमध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती. बॅलेटवर पुन्हा येण्याचा कोणताही प्रश्नच नाही. जर अजून पुष्टी करायची असेल तर VVPAT मोजून घ्यावं," असंही ते म्हणाले.

"निवडणुक आयोगावरील भरवसा कमी झाला"यावेळी कुरैशी यांना निवडणूक आयोगावरी भरवसा कमी झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. "हो, दुर्देव आहे पण खरं आहे. देशाला निवडणूक आयोगावर खुप भरवसा होता. मला असं बोलण्यात खुप दु:ख होतं. मी यावर काही बोलू इच्छित नाही. मी माझ्या नंतरच्या लोकांबद्दल वाईट बोलतोय असं वाटेल. याचं कारण तिथली लोकं आहे. काही शेषन यांच्यासारखे कठोर लोक सापडतील, तर काही कमकुवत आणि काही चमचेगिरी करणारे सापडतील," असंही कुरैशी म्हणाले.

"यासाठी नियुक्तीची पद्धत कॉलेजियम सिस्टम प्रमाणे बदलायला हवी. निवडणूक आयोगात जे धाडस होते त्यावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुणी त्याच्याकडे बोट दाखवलं तर मला वेदना होतात, कुणीतरी मला कानशिलात लगावतंय असं वाटतं," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग