शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“५०० वर्षांनी रामजन्मभूमी परत मिळू शकते, तर पाकमधून सिंधू का नाही?”: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 20:04 IST

CM Yogi Adityanath: १९४७ मध्ये फाळणी थांबवता आली असती. परंतु, केवळ एका व्यक्तीच्या हट्टामुळे भारताचा मोठा भाग वेगळा झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

CM Yogi Adityanath: ५०० वर्षांनी श्री रामजन्मभूमी परत मिळू शकते, तर पाकिस्तानमध्ये असलेला सिंधू का परत मिळू नये, असे मोठे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. सिंधी समाज संमेलनाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.

सिंधी समाज हा भारताच्या सनातन धर्माचा एक भाग आहे. १९४७ मध्ये झालेली देशाची फाळणी थांबवता आली असती. परंतु, केवळ एका व्यक्तीच्या हट्टामुळे भारताचा मोठा भाग पाकिस्तानच्या रूपाने वेगळा झाला. आजही फाळणीचे परिणाम दहशतवादाच्या रूपाने दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सीमेपलीकडील दहशतवाद भारतात शेवटच्या घटका मोजत आहे. जर श्री रामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येत असेल तर आपण पाकिस्तानमधून सिंधू परत घेऊ शकत नाही असे काही कारण नाही, असे विधान करत हे आताच्या पिढीला सांगा. तुमच्या पूर्वजांबद्दल सांगा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.

प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे

पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, नक्कीच यश मिळेल. प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे.पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने काशी विश्वनाथ परिसराचा कायापालट झाला आहे. देशातील वारसास्थळांबाबतचा हा आदर आहे. अयोध्या, काशी विश्वनाथ धाम, माँ विंध्यवासिनी धाम, प्रयागराजला भेट द्या. राज्यात अनेक नवीन गोष्टी घडत आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. 

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार राम कथा संग्रहालय आणि आर्ट गॅलरी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला देण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. यासाठी लखनऊ येथे सामंजस्य करार करण्यात येणार आहे. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी होणार आहे.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश