शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

"त्रिवेणी संगमाचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य"; CM योगींचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:51 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे

Yogi Adityanath on Mahakumbh Sangam Water: महाकुंभातील त्रिवेणी संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नदीचे पाणी स्नान करण्यासाठी चांगले नसल्याचे अहवालातून समोर आलं आहे. त्रिवेणी संगमावरील पाण्याबद्दल केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या रिपोर्टवरुन सध्या वाद सुरु आहे. हे पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी योग्य नसल्याचे समोर आलं आहे. या विषाणूमुळे लोक आजारी पडू लागले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत भाषण करताना महाकुंभाचा उल्लेख करत समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभातील पाण्याच्या गुणवत्तेवरुन होणाऱ्या दाव्यावरही भाष्य केलं. महाकुंभातील संगमचे पाणी पिण्यासाठी  आणि आंघोळीसाठीही योग्य असल्याचे मुख्यमंत्री योगींनी स्पष्टपणे सांगितले. संगमच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण ८ ते ९ टक्के असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीकडे हा अहवाल सादर केला. महाकुंभ मेळ्याच्या दौऱ्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पाण्यात फेकल कोलीफॉर्मची पातळी गुणवत्ता मानकांनुसार योग्य नसल्याचे अहवालातून सांगण्यात आलं. त्रिवेणी संगमाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असताना पाणी केवळ आंघोळीसाठी योग्य नसून ते पिण्यासही योग्य असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. हा महाकुंभ बदनाम करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. तसेच संगम आणि परिसरातील सर्व नाल्यांना टेप करण्यात आले असून शुद्धीकरणानंतरच पाणी सोडले जात आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

"उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सतत निरीक्षण करत आहे. आजच्या अहवालानुसार, संगम जवळील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण ८-९ च्या आसपास आहे. म्हणजे संगमाचे पाणी केवळ आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य आहे. फेकल कोलीफॉर्म वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की सांडपाण्याची गळती आणि प्राण्यांची विष्ठा. पण प्रयागराजमध्ये फेकल कोलीफॉर्मचे प्रमाण मानकांनुसार १०० मिलीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ हा खोटा प्रचार महाकुंभाला बदनाम करण्यासाठीच आहे," असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथ