शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"त्रिवेणी संगमाचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य"; CM योगींचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:51 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे

Yogi Adityanath on Mahakumbh Sangam Water: महाकुंभातील त्रिवेणी संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नदीचे पाणी स्नान करण्यासाठी चांगले नसल्याचे अहवालातून समोर आलं आहे. त्रिवेणी संगमावरील पाण्याबद्दल केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या रिपोर्टवरुन सध्या वाद सुरु आहे. हे पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी योग्य नसल्याचे समोर आलं आहे. या विषाणूमुळे लोक आजारी पडू लागले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत भाषण करताना महाकुंभाचा उल्लेख करत समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभातील पाण्याच्या गुणवत्तेवरुन होणाऱ्या दाव्यावरही भाष्य केलं. महाकुंभातील संगमचे पाणी पिण्यासाठी  आणि आंघोळीसाठीही योग्य असल्याचे मुख्यमंत्री योगींनी स्पष्टपणे सांगितले. संगमच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण ८ ते ९ टक्के असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीकडे हा अहवाल सादर केला. महाकुंभ मेळ्याच्या दौऱ्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पाण्यात फेकल कोलीफॉर्मची पातळी गुणवत्ता मानकांनुसार योग्य नसल्याचे अहवालातून सांगण्यात आलं. त्रिवेणी संगमाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असताना पाणी केवळ आंघोळीसाठी योग्य नसून ते पिण्यासही योग्य असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. हा महाकुंभ बदनाम करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. तसेच संगम आणि परिसरातील सर्व नाल्यांना टेप करण्यात आले असून शुद्धीकरणानंतरच पाणी सोडले जात आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

"उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सतत निरीक्षण करत आहे. आजच्या अहवालानुसार, संगम जवळील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण ८-९ च्या आसपास आहे. म्हणजे संगमाचे पाणी केवळ आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य आहे. फेकल कोलीफॉर्म वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की सांडपाण्याची गळती आणि प्राण्यांची विष्ठा. पण प्रयागराजमध्ये फेकल कोलीफॉर्मचे प्रमाण मानकांनुसार १०० मिलीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ हा खोटा प्रचार महाकुंभाला बदनाम करण्यासाठीच आहे," असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथ