शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

UP Election 2022: 'मोफत राशन मिळणं हेच खरं रामराज्य', भाजपाच्या 'जन विश्वास यात्रे'त योगी आदित्यनाथ यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 16:37 IST

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीनं आज जन विश्वास यात्रेची (Jan Vishwas Yatra) सुरुवात करण्यात आली आहे.

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीनं आज जन विश्वास यात्रेची (Jan Vishwas Yatra) सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या उपस्थितीत मथुरा येथून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्लाबोल करतानात भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. 

"मी आज १९ व्यांदा बृज भूमीवर येत आहे. सर्वात आधी मी कृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेतलं. माझ्या हस्ते आज जन विश्वास यात्रेचा शुभारंभ होत आहे यासाठी मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. येथील मातीच्या कणाकणामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा अधिवास आहे", असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 

"गरीबांना मोफत अन्नधान्य मिळणं हेच खरं रामराज्य आहे. आम्ही जे वचन जनतेला दिलं ते आम्ही पूर्ण केलं आणि याचं विरोधकांना खूप दु:ख होत आहे. आम्ही काश्मीरमधून कलम ३७० हटवलं. या कलमामुळे देशात दहशतवादाला प्रोत्साहन मिळत होतं. मोदी आणि शहा यांना जशी संधी मिळाली तसं दोघांनी मिळून जाचक कलम ३७० ला केराची टोपली दाखवली", असंही योग्य आदित्यनाथ म्हणाले. 

आम्ही जे म्हटलं ते करुन दाखवलं. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात देखील झाली आहे. मिर्जापूरमध्येही माँ विध्यवासिनी यांचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. याआधी काशी आणि अयोध्येला जाण्याची कुणी हिंमत करत नसे. पण मोदीजींनी भोलेनाथांचं दर्शन घेतल्यानंतर श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला. असं कधी आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी केलं आहे का?, असा सवाल उपस्थित करत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदींसाठी संपूर्ण देश त्यांचं कुटुंब आहे. तर सपा, बसपा आणि काँग्रेससाठी केवळ त्यांचं स्वत:चं कुटुंबच त्यांचं आहे. जनतेची त्यांना काही पडलेली नाही, असा हल्लाबोल यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केला. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश