शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

युक्रेनमधील भारतीयांना सुरक्षित परत आणू शकतोय हेच देशाच्या वाढत्या सामर्थ्याचं द्योतक- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:53 IST

रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी 'ऑपरेशन गंगा'च्या अंतर्गत शक्य ते सारे प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी 'ऑपरेशन गंगा'च्या अंतर्गत शक्य ते सारे प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हजारो नागरिकांना आतापर्यंत सुखरूप परत आणण्यात यश आलं असून आज युक्रेनमधील भारतीय नागरिकांना आपण परत आणू शकत आहोत हेच देशाच्या वाढत्या सामर्थ्याचं द्योतक आहे, असंही मोदी म्हणाले. ते उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित रॉबर्ट्सगंज येथील जाहीर सभेत बोलत होते. 

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेच्या मोहितमेला अधिक गती येण्यासाठी भारतानं आपले चार मंत्री तेथे पाठवले आहेत. भारतीयांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कसर सोडणार नाही, असं मोदी म्हणाले. "जे लोक आत्मनिर्भर भारत मोहिमेची खिल्ली उडवतात, जे लोक भारतीय सैन्याचा अपमान करतात, जे लोक भारतीयांच्या मेहनतीनं सुरू असलेल्या मेक इन इंडिया अभियानाचीही खिल्ली उडवतात असे घराणेशाही गाजवणारे लोक भारताला कधीच ताकदवान बनवू शकत नाहीत. या घराणेशाही गाजवाऱ्या लोकांना पदोपदी भारताचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. हा अपमान उत्तर प्रदेशातील लोकांचा अपमान आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

"ज्यांनी यूपीच्या जनतेला अशा परिस्थितीत जगण्यास भाग पाडलं. स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला नेहमीच मागे ठेवण्याचं काम केलं. मी आज सोनभद्र येथील नागरिकांना विनंती करायला आलोय की अशा लोकांना कधीच माफ करू नका", असं आवाहन मोदींनी यावेळी केलं. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा