शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

Uttar Pradesh Assembly Election: भाजपच्या मित्रपक्षांना हव्यात जास्त जागा; ओबीसी नेते सपात गेल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 06:19 IST

अपना दल आणि निषाद पार्टीकडे गैरयादव मागास समाजाची मते असल्यामुळे भाजपच्या नेतृत्वावर दबाव

- शरद गुप्तानवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातून ओबीसी वर्गाच्या तीन मंत्र्यांसह दीड डझन आमदार बाहेर पडल्यामुळे, त्याच्या इतर मित्रपक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे.अपना दल आणि निषाद पार्टीकडे गैरयादव मागास समाजाची मते असल्यामुळे भाजपच्या नेतृत्वावर दबाव आहे. या समाजाचा प्रभाव पूर्व उत्तर प्रदेशात असल्यामुळे व तिकडे शेवटच्या २ टप्प्यात मतदान असल्यामुळे दोन्ही पक्ष घाई करीत नाहीत. अपना दलने २०१७ मध्ये १२ जागा लढविल्या व ९ जिंकल्या. आता पक्षाच्या अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी २० जागा मागितल्या असून, भाजपने १४ जागांची तयारी दाखविली आहे.दुसरा मित्र पक्ष निषाद पार्टी २०१७ मध्ये भाजपसोबत नव्हती. त्याने तेव्हा ७२ जागा लढवल्या. एकही जिंकली नाही. आता त्याला २५ जागा हव्या आहेत, तर भाजपने १७ जागांची तयारी दाखविली आहे, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर गोरखपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत निषाद पार्टीचे प्रवीण निषाद यांनी सपाकडून लढून भाजपचे उमेदवार रवि किशन यांना पराभूत केले. नंतर एका वर्षाने प्रवीण वडील डॉ. संजय निषाद यांच्यासह भाजपमध्ये दाखल झाले व संत कबीरनगर मतदारसंघातून लोकसभेत गेले.संजय निषाद म्हणाले...संजय निषाद यांचे म्हणणे असे की,“गंगा, यमुना, शारदा आणि घाघरा नदीच्या काठांना उत्तरेकडून दक्षिण उत्तर प्रदेशपर्यंत जवळपास १०० विधानसभा मतदारसंघात आमचा प्रभाव आहे.तरीही आम्ही फक्त २५ जागा मागत आहोत.” अनुप्रिया पटेल यांना अपनी पार्टीच्या वाढत्या प्रभावाला पाहून जास्त जागा हव्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा