शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Uttar Pradesh Assembly Election: भाजप-जेडीयू बोलणी फिसकटली; यूपीत जेडीयू स्वबळावर लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 06:36 IST

भाजपचा प्रतिसाद नाही; आम्ही स्वबळावर लढू : त्यागी

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जनता दलात (संयुक्त) जागा वाटपाची बोलणी शेवटच्या प्रयत्नांतही अपयशी ठरली. उत्तर प्रदेशमध्ये २००७ मध्ये भाजप व जनता दलाने (संयुक्त) निवडणूक एकत्र लढविली होती. ते लक्षात घेऊन भाजपने बिहारमध्ये राष्ट्रीय लाेकशाही आघाडीत (रालोओ) सहभागी असलेल्या आमच्या पक्षाला सामावून घ्यावे, अशी जनता दलाची (संयुक्त) इच्छा आहे. तेव्हा जनता दलाने (संयुक्त) २२ जागा लढवून २ जिंकल्या, तर भाजपने ४५. मायावतींनी सत्ता स्थापन केली होती.जनता दलाने (संयुक्त) आपले वरिष्ठ नेते आणि केंद्रीय पोलाद मंत्री आरसीपी सिंह यांना भाजपसोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारी दिली होती. परंतु, वाटाघाटी निष्फळ ठरल्या आणि आम्हाला स्वबळावर लढावे लागू शकेल, असे जनता दलाने (संयुक्त) म्हटले. जनता दलाचे (संयुक्त) सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना ‘आम्ही उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ५० जागा मागत आहोत आणि यावर चर्चा करण्याची इच्छा आहे. भाजपने विचार करून शक्तिशाली आघाडी करावी. परंतु, तसे काही दिसत नाही.” असे म्हटले. आर.सी.पी. सिंह हे भाजप आणि अमित शाह, राजनाथ सिंग, जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान या वरिष्ठ नेत्यांच्या नियमित संपर्कात आहेत. परंतु, या क्षणी तरी काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. जनता दलाला (संयुक्त) ५० पेक्षा कमी जागांवरही तडजोड करायची होती, असे त्यागी म्हणाले. भाजप उत्तर प्रदेशमधील नितीश कुमार यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद न देण्यामागील एक कारण हे बिहारमध्ये जनता दलाशी (संयुक्त) वाढते मतभेद हे आहे. हे मतभेद विधान परिषद निवडणुकीसाठी जागा वाटप, दारूबद्दलचे धोरण आणि इतर विषयांवर आहेत.अहंकार निर्माण झाला : भाजप उत्तर प्रदेशमध्ये आघाडी करण्यास का प्रतिसाद देत नाही, असे विचारल्यावर त्यागी म्हणाले, ‘स्वबळावर निवडणूक जिंकण्याएवढा अहंकार भाजपला निर्माण झाला आहे.’

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा