शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आता 'या' राज्यात लोकांनी मास्क वापरला नाही, तर पोलिसांवर होणार कारवाई; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 13:32 IST

न्यायालयाने म्हटले आहे, की सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत 50हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. सरकारने ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेन्टचा वेग वाढवावा. तसेच, शहरांत खुली मैदाने घेऊन तेथे अस्थायी रुग्णालये तयार करून कोरोना पीडितांवर उपचाराची व्यवस्था करावी. 

प्रयागराज - उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाढत्या  कोरोना संक्रमणावर चिंता व्यक्त करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) सरकारला  संक्रमणामुळे अधिक प्रभावित झालेल्या शहरांत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा सल्ला दिली आहे. सरकारने दोन अथवा तीन आठवड्यांच्या पूर्ण लॉकडाउनवर विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर रस्त्यावर कुणीही व्यक्ती विना मास्क आढळल्यास पोलिसांवर अवमानना कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. (Uttar Pradesh Allahabad high court says without showing mask contempt action will be taken against police)

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

न्यायालयाने म्हटले आहे, की सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत 50हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. सरकारने ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेन्टचा वेग वाढवावा. तसेच, शहरांत खुली मैदाने घेऊन तेथे अस्थायी रुग्णालये तयार करून कोरोना पीडितांवर उपचाराची व्यवस्था करावी. 

कोरोनासंदर्भातील एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा तसेच न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की नाइट कर्फ्यू अथवा कोरोना कर्फ्यू संक्रमणाचा प्रसार होऊ नये, यासाठी उचललेली छोटी पावले आहेत. याचा उपयोग केवळ नाइट पार्टी तसेच नवरात्र अथवा रमजानमधील धार्मिक गर्दी थांबवण्यासाठीच मर्यादित आहे.

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी? न्यायालयाने म्हटले आहे, की लॉकडाउन लावणे योग्य नाही. मात्र, संक्रमण ज्या पद्धतीने पसरत आहे, ते पाहता, सरकारने अधिक संक्रमण असलेल्या शहरांत लॉकडाउन लावण्यावर विचार करायला हवा. कोरोनाचे अधिक संक्रमण असलेल्या शहरांत लखनौ, कानपूर, प्रयागराज, वाराणसी आणि गोरखपूर शहरांचा समावेश आहे.

विकास लोकांसाठी, लोकच नसतील तर विकासाचा काय उपयोग -न्यायालयाने म्हटले आहे, जेव्हा महापूर येतात, तेव्हा नदीवरील बांधही ते रोखू शकत नाहीत. त्यामुळे आपल्यालाही कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. दिवसाच्या अनावश्यक वाहतुकीवरही नियंत्रण आणायला हवे. जीवन राहिले तरच त्याचा उपभोगही घेता येईल आणि अर्थव्यवस्थाही सुरळीत होईल. विकास लोकांसाठी आहे. जर लोकच राहिले नाही, तर विकासाला काय अर्थ उरेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून मोठा खुलासा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस