शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रेशनसाठी विवाहित,पेन्शनसाठी विधवा झाल्या ४४८७ महिला; उत्तर प्रदेशातील मोठा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 12:18 IST

उत्तर प्रदेशातील रेशन घोटाळा समोर आला आहे. येथे एक-दोन नव्हे तर ४४८७ महिला आहेत ज्या विधवा झाल्यानंतर निराधार पेन्शन घेत आहेत आणि रेशनकार्डमध्ये पतीचा वाटाही घेत आहेत.

केंद्र सरकारने मोफत रेशन योजना सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून अनेकांना मोफत किंवा स्वस्त दरात धान्य मिळत असते. पण या योजनेतही अनेकजण घोटाळा करत असल्याचे समोर आले आहे. असाच एक घोटाळा उत्तर प्रदेशमधून समोर आला आहे, उत्तर प्रदेशात महिला एकाचवेळी पेन्शन आणि रेशनचा लाभ घेतल्याची ४,४८७ प्रकरणे समोर आली आहेत.  ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर निराधार पेन्शन घेत आहेत आणि त्याच महिला शिधापत्रिकेत त्यांच्या पतीचा वाटाही घेत असल्याचे समोर आले आहे. शिधापत्रिकेशी आधार लिंक केल्यानंतर या दोन्ही विभागाच्या हजारो महिला लाभार्थी असल्याचे सत्य समोर आले.

Maharashtra Rain Live Updates : पुण्यात पुराचा धोका, सांगली-कोल्हापुरातही पूरस्थिती; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ही एका जिल्ह्याची आकडेवारी आहे. फूड लॉजिस्टिक्स विभागाने महिला कल्याण विभागाकडून यादी मागवली असता ४ हजार ४८७ महिला महिला कल्याण विभागाकडून पेन्शन घेत असतानाही रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या पतीच्या वाट्याचे रेशन घेत असल्याचे आढळून आले.

जिल्हा पुरवठा अधिकारी कृष्णा गोपाल पांडे यांनी सांगितले की, निराधार महिला पेन्शन लाभार्थ्यांची यादी सरकारकडून प्राप्त झाली आहे, जे त्यांच्या मृत पतीच्या अन्नधान्याचा वाटा रेशनकार्डद्वारे घेत होते. पडताळणीनंतर महिला ज्या योजनेसाठी पात्र असेल ती योजना लागू केली जाईल.

जवळपास तीन वर्षांपासून हा गोंधळ सुरू आहे. एका महिलेला दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळते. अशाप्रकारे तीन वर्षांत त्यांना १६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम पेन्शन म्हणून देण्यात आली आहे. याशिवाय महिलांनी एक युनिट अधिक रेशनचा लाभ घेतला. ही फक्त एका जिल्ह्याची आकडेवारी आहे.

सरकारने त्याची संपूर्ण राज्यात चौकशी सुरु केली आहे. तपासामुळे गरीब कल्याण योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील नऊ हजार आयकर भरणारे व सक्षम व्यक्ती रेशनकार्ड बनवून मोफत धान्याचा लाभ घेत असून गरजू वंचित राहत असल्याचे यापूर्वीच्या तपासात उघड झाले होते. या मोफत रेशनचा लाभ घेत ९,३१३ मोठ्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे, ज्यांनी त्यांच्या शेतातील धान्य सरकारला आधार किमतीवर विकले.

पेरणीनंतर अन्न पणन विभागाने दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख पटवली. ते आपले धान्य सरकारी खरेदी केंद्रांवर विकत राहिले आणि शेतकऱ्यांकडून मोफत रेशन घेत होते. आता पुरवठा विभाग त्यांची चौकशी करून शिधापत्रिका रद्द करणार आहे. अशाप्रकारे लोकांच्या लालसेने रेशनकार्ड, निराधार पेन्शन आणि आयुष्मान कार्डला मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfraudधोकेबाजी