शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

रेशनसाठी विवाहित,पेन्शनसाठी विधवा झाल्या ४४८७ महिला; उत्तर प्रदेशातील मोठा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 12:18 IST

उत्तर प्रदेशातील रेशन घोटाळा समोर आला आहे. येथे एक-दोन नव्हे तर ४४८७ महिला आहेत ज्या विधवा झाल्यानंतर निराधार पेन्शन घेत आहेत आणि रेशनकार्डमध्ये पतीचा वाटाही घेत आहेत.

केंद्र सरकारने मोफत रेशन योजना सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून अनेकांना मोफत किंवा स्वस्त दरात धान्य मिळत असते. पण या योजनेतही अनेकजण घोटाळा करत असल्याचे समोर आले आहे. असाच एक घोटाळा उत्तर प्रदेशमधून समोर आला आहे, उत्तर प्रदेशात महिला एकाचवेळी पेन्शन आणि रेशनचा लाभ घेतल्याची ४,४८७ प्रकरणे समोर आली आहेत.  ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर निराधार पेन्शन घेत आहेत आणि त्याच महिला शिधापत्रिकेत त्यांच्या पतीचा वाटाही घेत असल्याचे समोर आले आहे. शिधापत्रिकेशी आधार लिंक केल्यानंतर या दोन्ही विभागाच्या हजारो महिला लाभार्थी असल्याचे सत्य समोर आले.

Maharashtra Rain Live Updates : पुण्यात पुराचा धोका, सांगली-कोल्हापुरातही पूरस्थिती; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ही एका जिल्ह्याची आकडेवारी आहे. फूड लॉजिस्टिक्स विभागाने महिला कल्याण विभागाकडून यादी मागवली असता ४ हजार ४८७ महिला महिला कल्याण विभागाकडून पेन्शन घेत असतानाही रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या पतीच्या वाट्याचे रेशन घेत असल्याचे आढळून आले.

जिल्हा पुरवठा अधिकारी कृष्णा गोपाल पांडे यांनी सांगितले की, निराधार महिला पेन्शन लाभार्थ्यांची यादी सरकारकडून प्राप्त झाली आहे, जे त्यांच्या मृत पतीच्या अन्नधान्याचा वाटा रेशनकार्डद्वारे घेत होते. पडताळणीनंतर महिला ज्या योजनेसाठी पात्र असेल ती योजना लागू केली जाईल.

जवळपास तीन वर्षांपासून हा गोंधळ सुरू आहे. एका महिलेला दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळते. अशाप्रकारे तीन वर्षांत त्यांना १६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम पेन्शन म्हणून देण्यात आली आहे. याशिवाय महिलांनी एक युनिट अधिक रेशनचा लाभ घेतला. ही फक्त एका जिल्ह्याची आकडेवारी आहे.

सरकारने त्याची संपूर्ण राज्यात चौकशी सुरु केली आहे. तपासामुळे गरीब कल्याण योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील नऊ हजार आयकर भरणारे व सक्षम व्यक्ती रेशनकार्ड बनवून मोफत धान्याचा लाभ घेत असून गरजू वंचित राहत असल्याचे यापूर्वीच्या तपासात उघड झाले होते. या मोफत रेशनचा लाभ घेत ९,३१३ मोठ्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे, ज्यांनी त्यांच्या शेतातील धान्य सरकारला आधार किमतीवर विकले.

पेरणीनंतर अन्न पणन विभागाने दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख पटवली. ते आपले धान्य सरकारी खरेदी केंद्रांवर विकत राहिले आणि शेतकऱ्यांकडून मोफत रेशन घेत होते. आता पुरवठा विभाग त्यांची चौकशी करून शिधापत्रिका रद्द करणार आहे. अशाप्रकारे लोकांच्या लालसेने रेशनकार्ड, निराधार पेन्शन आणि आयुष्मान कार्डला मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfraudधोकेबाजी