शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

उत्कल एक्स्प्रेस अपघात अभियांत्रिकी चुकीमुळे?, उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 22:18 IST

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या ...

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, तर एका अधिका-याची बदली करण्यात आली आहे. एरव्ही काहीही झाले तरी शांत असणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या अपघाताने खूपच चिंतित झालेले जाणवले. त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांना आजच्या आज प्रथमदर्शनी माहितीच्या आधारे अपघाताचे कारण निश्चित करा, असा आदेश दिला होता. त्यानंतर लगेच यंत्रणा कामाला लागली. सायंकाळी उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय वरिष्ठ अभियंत्यांसह त्यांच्या विभागातील तिघांचे निलंबनाचे आदेश काढले.जेथे अपघात झाले तेथे रेल्वेरुळांचे दुरुस्तीचे काम सुरू होते. वाहतूक सुरू असताना असे काम करायचे असेल तर कामाच्या ठिकाणाच्या ब-याच आधी लाल झेंडे लावून त्यांची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. प्राथमिक चौकशीत असे आढळले की, अपघात झाले तेथे असे झेंडे लावलेले नव्हते. परिणामी ताशी १०५ किमी वेगाने धावणा-या उत्कल एक्प्रेसच्या ड्रायव्हरला आगाऊ सूचना न मिळाल्याने भरधाव गाडीला त्याला आयत्या वेळी ब्रेक लावावे लागले. परिणामी १४ डबे रुळांवरून घसरले व काही वेगामुळे एकमेकांवर चढले. हा चुकीसाठी अभियांत्रिकी विभागास प्रथमदशर्शनी जबाबदार धरण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद (वाहतूक) यांनी दिवसभर घटनास्थळी हजर राहून खोळंबलेली वाहतूक लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने काम करून घेतले.दरम्यान, मुजप्फरनगर येथील शवागारात २३ मृतांशी ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी दिवसभर गर्दी केली. रेल्वे आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर झालेले सानुग्रहअनुदान त्यांना तेथेच वितरित करण्याची व्यवस्था केली गेली. ५० जखमींना उपचारांनंतर सोडण्यात आले. अजूनही १०२ जखमी उपचार घेत आहेत.