शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

उत्कल एक्स्प्रेस अपघात अभियांत्रिकी चुकीमुळे?, उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 22:18 IST

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या ...

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, तर एका अधिका-याची बदली करण्यात आली आहे. एरव्ही काहीही झाले तरी शांत असणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या अपघाताने खूपच चिंतित झालेले जाणवले. त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांना आजच्या आज प्रथमदर्शनी माहितीच्या आधारे अपघाताचे कारण निश्चित करा, असा आदेश दिला होता. त्यानंतर लगेच यंत्रणा कामाला लागली. सायंकाळी उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय वरिष्ठ अभियंत्यांसह त्यांच्या विभागातील तिघांचे निलंबनाचे आदेश काढले.जेथे अपघात झाले तेथे रेल्वेरुळांचे दुरुस्तीचे काम सुरू होते. वाहतूक सुरू असताना असे काम करायचे असेल तर कामाच्या ठिकाणाच्या ब-याच आधी लाल झेंडे लावून त्यांची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. प्राथमिक चौकशीत असे आढळले की, अपघात झाले तेथे असे झेंडे लावलेले नव्हते. परिणामी ताशी १०५ किमी वेगाने धावणा-या उत्कल एक्प्रेसच्या ड्रायव्हरला आगाऊ सूचना न मिळाल्याने भरधाव गाडीला त्याला आयत्या वेळी ब्रेक लावावे लागले. परिणामी १४ डबे रुळांवरून घसरले व काही वेगामुळे एकमेकांवर चढले. हा चुकीसाठी अभियांत्रिकी विभागास प्रथमदशर्शनी जबाबदार धरण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद (वाहतूक) यांनी दिवसभर घटनास्थळी हजर राहून खोळंबलेली वाहतूक लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने काम करून घेतले.दरम्यान, मुजप्फरनगर येथील शवागारात २३ मृतांशी ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी दिवसभर गर्दी केली. रेल्वे आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर झालेले सानुग्रहअनुदान त्यांना तेथेच वितरित करण्याची व्यवस्था केली गेली. ५० जखमींना उपचारांनंतर सोडण्यात आले. अजूनही १०२ जखमी उपचार घेत आहेत.