शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

उत्कल एक्स्प्रेस अपघात अभियांत्रिकी चुकीमुळे?, उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 22:18 IST

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या ...

नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, तर एका अधिका-याची बदली करण्यात आली आहे. एरव्ही काहीही झाले तरी शांत असणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या अपघाताने खूपच चिंतित झालेले जाणवले. त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांना आजच्या आज प्रथमदर्शनी माहितीच्या आधारे अपघाताचे कारण निश्चित करा, असा आदेश दिला होता. त्यानंतर लगेच यंत्रणा कामाला लागली. सायंकाळी उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय वरिष्ठ अभियंत्यांसह त्यांच्या विभागातील तिघांचे निलंबनाचे आदेश काढले.जेथे अपघात झाले तेथे रेल्वेरुळांचे दुरुस्तीचे काम सुरू होते. वाहतूक सुरू असताना असे काम करायचे असेल तर कामाच्या ठिकाणाच्या ब-याच आधी लाल झेंडे लावून त्यांची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. प्राथमिक चौकशीत असे आढळले की, अपघात झाले तेथे असे झेंडे लावलेले नव्हते. परिणामी ताशी १०५ किमी वेगाने धावणा-या उत्कल एक्प्रेसच्या ड्रायव्हरला आगाऊ सूचना न मिळाल्याने भरधाव गाडीला त्याला आयत्या वेळी ब्रेक लावावे लागले. परिणामी १४ डबे रुळांवरून घसरले व काही वेगामुळे एकमेकांवर चढले. हा चुकीसाठी अभियांत्रिकी विभागास प्रथमदशर्शनी जबाबदार धरण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद (वाहतूक) यांनी दिवसभर घटनास्थळी हजर राहून खोळंबलेली वाहतूक लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने काम करून घेतले.दरम्यान, मुजप्फरनगर येथील शवागारात २३ मृतांशी ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी दिवसभर गर्दी केली. रेल्वे आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर झालेले सानुग्रहअनुदान त्यांना तेथेच वितरित करण्याची व्यवस्था केली गेली. ५० जखमींना उपचारांनंतर सोडण्यात आले. अजूनही १०२ जखमी उपचार घेत आहेत.