शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एअरपोर्टवर प्रवेशासाठी लवकरच बायोमॅट्रीक पद्धतीचा होणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 08:52 IST

भारत सरकारकडून विमान प्रवसाची बोर्डिंग प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ठळक मुद्देभारत सरकारकडून विमान प्रवसाची बोर्डिंग प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतात कुठेही विमानाने प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचा मोबाइल फोन असणं गरजेचं आहे. उड्डाण मंत्रालयाकडून एअरलाइन्स आणि एअरपोर्टच्या डेटाबेसला प्रवाशांच्या आयडी कार्ड म्हणजेच आधार कार्ड आणि पासपोर्ट नंबरशी जोडण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- भारत सरकारकडून विमान प्रवसाची बोर्डिंग प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आता भारतात कुठेही विमानाने प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचा मोबाइल फोन असणं गरजेचं आहे. उड्डाण मंत्रालयाकडून एअरलाइन्स आणि एअरपोर्टच्या डेटाबेसला प्रवाशांच्या आयडी कार्ड म्हणजेच आधार कार्ड आणि पासपोर्ट नंबरशी जोडण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. उड्डाण सचिव आर.एन चौबे यांच्या माहितीनुसार, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवासी बायोमॅट्रीक टेकनिकचा वापर स्वतःची ओळख दाखवायला करू शकतात. यामुळे त्यांना एअरपोर्टवर त्यांचं आयडी कार्ड दाखवायची गरज पडणार नाही. विशेष म्हणजे प्रवाशांना त्यांचं तिकीट किंवा ई-तिकीट दाखवायची गरज पडणार नाही. एअरलाइन्सच्या डेटाबेसमध्ये तिकीट बुक केल्याची माहिती सेव्ह होणार असल्याने, तिकीट पुन्हा दाखवायची गरज नाही.

डेटाबेस लिंक केल्यामुळे जेव्हा प्रवासी बोर्डिंग गेटवर आल्यावर त्याचं आधी सिक्युरिटी चेकइन झालं आहे की नाही तेसुद्धा समजणार आहे. 'आम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासाठी एख विशेष युनिट तयार केलं असून त्या युनीटकडून 'डीजी यात्रा' योजनेला आकार देण्याचं काम करतं आहे. एअरपोर्ट ऑपरेटर विशेषकरून बंगळुरू आणि हैदराबादच्या ऑपरेटर्सचा या युनिटमध्ये सहभाग आहे, अशी माहिती उड्डाण सचिव आर.एन चौबे यांनी दिली आहे .या योजनेच्या खर्चाची आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेची माहिती लवकरच मिळणार आहे, त्यानंतरच अंमलबजावणी केली जाईल, असंही उड्डाण सचिव म्हणाले आहेत. 

दुसरीकडे,एअरपोर्ट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार डेटाबेसमुळे विमानाच्या उड्डाणाची वेळ झाल्यावर बोर्डिंग गेटमधून प्रवेश देता येईल. यामुळे प्रवाशांची अनावश्यक गर्दी संपेल तसंच वेळेच्या आधी बोर्डिंग गेटजवळ येऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला यामुळे चाप बसेल. या नव्या बायोमॅट्रीक योजनेमुळे बोर्डिंग कार्डावर सिक्युरिटी चेकसाठी लावल्या जाणाऱ्या स्टॅम्पपासून पण मुक्ती मिळेल. सध्या विमान प्रवास करण्यासाठी बोर्डिंग पासवर स्टॅम्प गरजेचा आहे. जे प्रवाशांचं विमानतळावर सिक्युरिटी चेकिंग झालं असतं अशांच्या बोर्डिंग कार्डवर स्टॅम्प लावले जातात.  

देशात सध्या 17 एअरपोर्टवर हॅण्डबॅगेवर स्टॅम्पिंग प्रक्रियेवर बंदी घातली गेली आहे. तसंच दहा एअरपोर्टवर यासाठीचं ट्रायल सुरू आहे.