शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

उत्तराखंडमध्ये अमेरिकी सैनिक; चीनचा तिळपापड झाला, भारताने उत्तर डागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 12:24 IST

भारत अमेरिकेच्या युद्धाभ्यासामुळे एलएसीवर शांततेचा भंग होत असल्याचे चीनने म्हटले होते.

भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य गोळा करणाऱ्या चीनची तंतरली आहे. अचानक उत्तराखंडमध्ये अमेरिकी सैनिकांना पाहून चीनचा तिळपापड झाला आहे. यावर भारताने ताबतोब चीनवर उत्तरही डागले आहे. आमच्या जमिनीवर आम्ही युद्धाभ्यास करत असू तर तिसऱ्या देशाचा यात काय संबंध अशा शब्दांत सुनावले आहे. 

उत्तराखंडमध्ये भारत आणि अमेरिकेच्या सैन्यामध्ये युद्धाभ्यास सुरु झाला आहे. यावर चीनने आक्षेप नोंदविला आहे. यावर भारताने लागलीच उत्तर दिले आहे. चीनने आधी आरशात तोंड पहावे, लडाखमध्ये अतिक्रमण करून चीनने कशाप्रकारे सामंजस्य कराराचे उल्लंघन केलेय ते पहावे, अशा शब्दांत भारताने सुनावले आहे.

भारत अमेरिकेच्या युद्धाभ्यासामुळे एलएसीवर शांततेचा भंग होत असल्याचे चीनने म्हटले होते. अमेरिकेची एलएसीवरील उपस्थिती चीनला खटकली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताने कोणासोबत लष्करी सराव करायचा आणि कोणासोबत नाही हे सांगण्याचा अधिकार कोणत्या तिसऱ्या देशाला दिलेला नाही. या सरावाचा द्विपक्षीय संबंधांशी काहीही संबंध नाही. चीनने तरीही यावर आक्षेप नोंदविल्याने त्यांना सांगणे गरजेचे आहे. चीनने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. स्वतः 1993 आणि 1996 च्या करारांचे उल्लंघन केले आहे.

1993 चा करार LAC वर शांतता राखण्यासाठी आहे. 1996 चा करार 'भारत-चीन सीमा क्षेत्रा'वर दोन्ही बाजूंकडून एकमेकांना विश्वासू वातावरण निर्माण करण्यावर आहे. चीनमधील कडक कोरोना लॉकडाऊनच्या निषेधाबाबत विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. कोरोनाला तोंड देण्यासाठी कोणत्याही देशाच्या रणनीतीवर मी भाष्य करणार नाही. यासोबतच लवकरच जग कोरोनाच्या कहरातून बाहेर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAmericaअमेरिकाchinaचीन