शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

उरी, पठाणकोटवरील हल्ल्यांच्या आठवणी झाल्या जाग्या; आता पुन्हा अशाच कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 06:11 IST

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरानजीक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या जवानांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे २०१६ साली काश्मीरमधील उरी व पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.

नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरानजीक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या जवानांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे २०१६ साली काश्मीरमधील उरी व पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. उरी व पठाणकोट हल्ल्यांचा सूड उगविण्यासाठी भारतीय लष्कराने २८ सप्टेंबर २०१६च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद््ध्वस्त केले होते.दोन्ही हल्ल्यांत पाकिस्तानचा हातबारामुल्ला जिल्ह्यात १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथील लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २१ जवान शहीद झाले. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात चार दहशतवादी ठार झाले होते. आधी १ जानेवारी २०१६ रोजी पाक दहशतवाद्यांनी पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला होता. त्यात तीन जवान शहीद व सहा दहशतवादी ठार झाले.नागरोटा येथील १६ कॉर्प्स मुख्यालयावर २९ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह ७ जवान शहीद झाले होते.शाळा, बँका, कार्यालयांना आगीयाखेरीज गेल्या २0 वर्षांत अतिरेक्यांनी काश्मीरमधील अनेक शाळांना आगी लावल्या, बँका लुटल्या वा त्या पेटवून दिल्या, एटीएम लुटली आणि सरकारी कार्यालयांनाही आगी लावून ती उद्ध्वस्त केली आहेत. अशा प्रकारांची संख्या ३00 हून अधिक आहे.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला