शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

उरी हल्ल्याचा जगभर निषेध; दहशतवाद्यांवर कारवाई हवीच

By admin | Updated: September 20, 2016 05:53 IST

प्रत्येक देशाने आपल्या भूमीवर राहून इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर परिणामकारक कारवाई केलीच पाहिजे, असे फ्रान्सने सोमवारी म्हटले.

नवी दिल्ली : प्रत्येक देशाने आपल्या भूमीवर राहून इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर परिणामकारक कारवाई केलीच पाहिजे, असे फ्रान्सने सोमवारी म्हटले. काश्मीर प्रश्नावर शांततामय मार्गांनी तोडगा शोधणे महत्वाचे आहे, असे फ्रेंचच्या परराष्ट्र मंत्रालयाने येथे निवेदनाद्वारे म्हटले. फ्रान्सने उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादाविरोधातील लढाईत फ्रान्स भारताबरोबर आहे, असे त्यात नमूद करण्यात आले. पाकिस्तान आणि रशियाच्या २४ सप्टेंबरपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायती रद्द करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. उरी हल्ल्याच्या आधीच भारताने या कवायतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र उरी हल्ल्यानंतर रशियाने त्या रद्द करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी उरी येथील हल्ल्याचा निषेध करून अपराध्यांना कठोर शिक्षा होईल व पुन्हा स्थैर्य निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली.काश्मीर खोऱ्यात वाढता हिंसाचार आणि तापत जाणाऱ्या वातावरणाबद्दल चीनने सोमवारी चिंता व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तानने मतभेद संवादाद्वारे व परस्परांत सहकार्य वाढवून सोडवावेत, असे आवाहनही केले. उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्हाला धक्का बसल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आमचा विरोध असून आम्ही दहशतवादाचा निषेध करतो. काश्मीर खोऱ्यात वाढलेला हिंसाचार आणि तापमान याची आम्हाला काळजी वाटते. संबंधित देश आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी संवाद व सल्लामसलतीद्वारे प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे. त्यांना आपापसात दहशतवाद विरोधातील प्रयत्नांचे सहकार्यही वाढवावे लागेल. फक्त याच मार्गाने त्या भागात शांतता आणि सुरक्षितता स्थापन होईल, असेही कांग म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>रशियाने रद्द केल्या पाकसोबतच्या संयुक्त कवायती पाकिस्तान आणि रशियाच्या २४ सप्टेंबरपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायती रद्द करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. उरी हल्ल्याच्या आधीच भारताने या कवायतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र उरी हल्ल्यानंतर रशियाने त्या रद्द करण्याचे ठरविले. पाकला एकटे पाडण्यासाठी भारतातर्फे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला रशियाच्या निर्णयाने यश मिळाले आहे.