शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उरी हल्ल्याचा जगभर निषेध; दहशतवाद्यांवर कारवाई हवीच

By admin | Updated: September 20, 2016 05:53 IST

प्रत्येक देशाने आपल्या भूमीवर राहून इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर परिणामकारक कारवाई केलीच पाहिजे, असे फ्रान्सने सोमवारी म्हटले.

नवी दिल्ली : प्रत्येक देशाने आपल्या भूमीवर राहून इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर परिणामकारक कारवाई केलीच पाहिजे, असे फ्रान्सने सोमवारी म्हटले. काश्मीर प्रश्नावर शांततामय मार्गांनी तोडगा शोधणे महत्वाचे आहे, असे फ्रेंचच्या परराष्ट्र मंत्रालयाने येथे निवेदनाद्वारे म्हटले. फ्रान्सने उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादाविरोधातील लढाईत फ्रान्स भारताबरोबर आहे, असे त्यात नमूद करण्यात आले. पाकिस्तान आणि रशियाच्या २४ सप्टेंबरपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायती रद्द करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. उरी हल्ल्याच्या आधीच भारताने या कवायतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र उरी हल्ल्यानंतर रशियाने त्या रद्द करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी उरी येथील हल्ल्याचा निषेध करून अपराध्यांना कठोर शिक्षा होईल व पुन्हा स्थैर्य निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली.काश्मीर खोऱ्यात वाढता हिंसाचार आणि तापत जाणाऱ्या वातावरणाबद्दल चीनने सोमवारी चिंता व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तानने मतभेद संवादाद्वारे व परस्परांत सहकार्य वाढवून सोडवावेत, असे आवाहनही केले. उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्हाला धक्का बसल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आमचा विरोध असून आम्ही दहशतवादाचा निषेध करतो. काश्मीर खोऱ्यात वाढलेला हिंसाचार आणि तापमान याची आम्हाला काळजी वाटते. संबंधित देश आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी संवाद व सल्लामसलतीद्वारे प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे. त्यांना आपापसात दहशतवाद विरोधातील प्रयत्नांचे सहकार्यही वाढवावे लागेल. फक्त याच मार्गाने त्या भागात शांतता आणि सुरक्षितता स्थापन होईल, असेही कांग म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>रशियाने रद्द केल्या पाकसोबतच्या संयुक्त कवायती पाकिस्तान आणि रशियाच्या २४ सप्टेंबरपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायती रद्द करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. उरी हल्ल्याच्या आधीच भारताने या कवायतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र उरी हल्ल्यानंतर रशियाने त्या रद्द करण्याचे ठरविले. पाकला एकटे पाडण्यासाठी भारतातर्फे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला रशियाच्या निर्णयाने यश मिळाले आहे.