शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
4
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाची गद्दारी
5
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
6
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
7
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
8
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
9
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
10
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
11
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
12
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
13
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
14
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
15
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
16
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
17
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
18
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
19
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
20
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?

कर्करोगांसारखे आजार वाढण्यामागे शहरीकरण !

By admin | Updated: August 6, 2016 04:00 IST

कॅन्सर आणि मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्यामागे नागरीकरण, वायुप्रदूषण आणि जीवनशैलीतील बदल आदी घटक कारणीभूत आहेत

नवी दिल्ली : कॅन्सर आणि मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्यामागे नागरीकरण, वायुप्रदूषण आणि जीवनशैलीतील बदल आदी घटक कारणीभूत आहेत, असे सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले. २०१०-२०१३ दरम्यान हृदयविकार, श्वसनविकार, कॅन्सर आणि अतिसार यामुळे सर्वाधिक मृत्यू झाले, असे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर आणि फुप्फुसाशी संबंधित विकारांचे प्रमाण वाढत चालले असून, शहरीकरण, तंबाखूचे सेवन, शारीरिक श्रमाचा अभाव, जीवनशैलीत बदल, अयोग्य आहार, उच्च रक्तदाब आणि मद्यसेवन यासारखे अनेक घटक त्याला कारणीभूत असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले. २००४-२००६ ते २०१०-१३ दरम्यान हृदयविकार, श्वसनसंस्था आणि पचनसंस्थेच्या विकारांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. आताही या आजारांचा मृत्यूदरातील वाटा वाढताच असून, कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे, असे ते म्हणाले. काही सरकारी रुग्णालयांत रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची तक्रार एका काँग्रेस सदस्याने केल्यानंतर नड्डा म्हणाले की, केंद्र सरकार आरोग्य सुविधांसाठी तळागाळापर्यंत वित्तीय आणि तांत्रिक साहाय्य पुरविते. तथापि, कार्यक्रमांची अंमलबजावणी हा सर्वस्वी राज्य सरकारांचा विषय आहे. निधीचा योग्य वापर होईल याची खबरदारी घेतली जावी, असे केंद्राला वाटते. त्यामुळेच संबंधित संसद सदस्यांना याबाबत निगराणीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या तुटवड्याबाबत तृणमूल काँग्रेसच्या सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नड्डा म्हणाले की, डॉक्टरांची नेमणूक करणे हा राज्य सरकारांचा विषय आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>उद्योग क्षेत्रातून मिळाले ७.५ कोटी अर्थसाह्यसीएसआर उपक्रमांतर्गत आरोग्य सुविधांसाठी अर्थसाहाय्य पुरवू इच्छिणाऱ्या उद्योगांसाठी हेल्थ मिनिस्टर्स कॅन्सर पेशन्ट फंड-कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलिटी अकाउंट ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ दरम्यान आतापर्यंत उद्योग क्षेत्रातून ७.५ कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.