शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

करून दाखवलं! तब्बल 35 परीक्षेत नापास झाला पण "त्याने' हार नाही मानली; जिद्दीने झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:07 IST

विजय वर्धन हे सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेत वारंवार नापास झाले, पण त्यांनी हार मानली नाही.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. मेहनत करणारा प्रत्येकजण प्रत्येक चुकातून शिकत पुढे जात असतो. निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केल्यास यश नक्कीच मिळते. एक-दोन परीक्षांमध्ये नापास झाल्यानंतर काही लोक निराश होतात, पण काही लोक तरीही हार मानत नाही. हरियाणातील या मुलाने 35 परीक्षांमध्ये नापास होऊनही हिंमत ठेवली.

विजय वर्धन हे सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेत वारंवार नापास झाले, पण त्यांनी हार मानली नाही. शेवटी, 35 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यानंतर, विजय वर्धन यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 104 वा क्रमांक मिळवून आयएएस बनले आहेत. विजय वर्धन वारंवार अपयश येऊन देखील खचले नाहीत तर चुकांमधून शिकत राहिले.

विजय यांचा जन्म हरियाणातील सिरसा येथे झाला, तेथील शाळेत त्याचे शिक्षण झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हिसार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केलं, त्यानंतर विजय वर्धन UPSC चे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेले. त्यांच्या तयारीदरम्यान, ते हरियाणा पीसीएस, यूपीपीएससी, एसएससी आणि सीजीएलसह 30 परीक्षांना बसले, परंतु त्या प्रत्येकामध्ये ते नापास झाले. 

2014 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली, नापास. त्यानंतर सलग चार वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी अपयश आले. 2018 मध्ये, ते UPSC पास केल्यानंतर आणि 104 वा ऑल इंडिया रँक (AIR) मिळवून IPS झाले. IPS पदावर खूश नव्हते, म्हणून 2021 मध्ये पुन्हा UPSC ची परीक्षा दिली आणि IAS झाले. 

आयएएस विजय वर्धन म्हणाले की नागरी सेवा इच्छुकांसाठी तुम्ही स्वत:च स्वत:साठी सर्वोत्तम प्रशिक्षक आहात. कोणताही निर्णय घेताना तुम्ही नेहमी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. अनेक वर्षांपासून पेपर देणाऱ्या उमेदवारांना ते म्हणाले की, ज्या टेक्निकवर तुम्ही आधीच काम करत आहात त्या टेक्निकची पुनरावृत्ती करू नका. रणनीती बदला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी