शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

UPSCच्या निकालात महाराष्ट्रातील सृष्टी देशमुख पाचवी, कनिष्क कटारिया देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 22:43 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे. या परीक्षेत कनिष्क कटारिया-पहिला, अक्षत जैन-दुसरा, जुनैद अहमद-तिसरा, श्रवण कुमार-चौथा, सृष्टी देशमुख-पाचवी, शुभम गुप्ता- सहावा, कर्नाटी वरुणरेड्डी- सातवा, वैशाली सिंह- आठवा, गुंजन द्विवेदी नववी, तर तन्मय शर्मा दहावा आला आहे. तर तृप्ती धोडमिसे ही 16वी, वैभव गौंदवे हा 25वा आला आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे. पहिल्या 50मध्ये यंदा महाराष्ट्रातील 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 759 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यापैकी 180 जणांनी आयएएस, 30 जणांनी आयएसएस, 150 जणांनी आयपीएस रँक मिळवला आहे.तर पुण्याच्या तृप्ती दोडमिसे या देशात 16व्या आल्या आहेत. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला, तर महिलांमधून सृष्टी देशमुख ही पहिली आली आहे. पुण्याच्या तृप्ती दोडमिसे दुस-या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे आई-वडील शिक्षक आहेत. त्या 10वी आणि 12वी या दोन्ही वर्षी बोर्डात अनुक्रमे 10व्या आणि 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर 2010मध्ये त्यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सीओईपी)मधून प्रॉडक्शनची पदवी घेतली. सध्या त्या सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. लग्नानंतरही त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला होता. संसार, नोकरी, घर आदी सगळे सांभाळून त्यांनी यूपीएससीमध्ये 16वा क्रमांक पटकावला आहे.यूपीएससीची परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर 2018मध्ये पार पडली. त्यानंतर फेब्रुवारी 2019मध्ये मुलाखती झाल्या. यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 759 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यांपैकी 180 जणांनी आयएएस, 30 जणांनी आयएसएस, 150 जणांनी आयपीएस रँक मिळवली आहे. ग्रुप ए मधून 384, ग्रुप बी मधून 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.देशपातळीवरील पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे. त्यात सृष्टी देशमुखने देशात पाचवे, पूजा मुळेने 11वे, तृप्ती दोडमिसेंनी 16वे, वैभव गौंदवेने 25वे, मनीषा आव्हाळेने 33वे, हेमंत पाटीलने 39वे तर ध्रुव मित्तलने 99वे स्थान प्राप्त केले. स्नेहल धायगुडेने 108, डॉ. श्रेणिक लोढाने 133, दिग्विजय पाटीलने 134, अमित काळेने 212, योगेश पाटीलने 231, नवजीवन पवार 316, सचिन पवार 444, मच्छिंद्र गलवे 640, अलोक सिंग 628, परमानंद दराडेने 615वे अशी रँक मिळवली आहे.चिकाटी अन् जिद्द सोडू नका‘लोकमत’शी बोलताना तृप्ती दोडमिसे म्हणाली, ‘‘यशाचा आनंद तर खूप आहे; पण त्यात मी एकटी नाही तर माझ्या सासर आणि माहेरच्या मंडळींचा आणि विशेषत: पती सुधाकर यांचा मोठा वाटा  आहे. त्यांच्या पाठिंब्यावर मी इथपर्यंत पोहोचू शकले. मी निराश होऊन अभ्यास सोडणा-या मुलांना एवढंच सांगेन, की तुम्ही चिकाटी आणि जिद्द सोडू नका; स्वप्न आपोआप तुमचा पाठलाग करत भेटायला येतील.’’ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या आयएफएसमाजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांना परराष्ट्र सेवेतून निवृत्त होऊन केवळ तीनच महिने उलटत असताना त्यांची कन्या पूजा हिने देशभरातून 11वा रँक पटकावून आयएफएस रँक मिळविली आहे. विशेष म्हणजे, तिच्या वाढदिवशी तिला ही अत्यंत आनंदाची बातमी समजली. परराष्ट्र खात्यात सेवा बजावण्याची मुळे  कुटुंबीयांची पंरपरा पूजाने कायम राखल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   ग्रुप ए मधून 384, ग्रुप बीमधून 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन टप्प्यातून जावे लागते. तसेच त्यांची खासगी मुलाखतही घेतली जाते. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग