शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससी परीक्षा वेळखाऊ; विद्यार्थ्यांचे आरोग्य येतेय धोक्यात, संसदीय समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 09:01 IST

भरतीचा कालावधी निश्चित करा; विलंबामुळे तरुणांना येतेय नैराश्य

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) १२ फेब्रुवारी २०२० मध्ये नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी केली. २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. म्हणजेच ही भरतीप्रक्रिया एक वर्ष, सात महिने आणि १२ दिवसांत पूर्ण झाली. २०१७-२०२१ पर्यंत सरासरी १५ महिन्यांत पूर्ण झाली. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्यायविषयक संसदीय स्थायी समितीने इतक्या लांबलचक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

प्रदीर्घ भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांचा वेळ वाया जातो, असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. समितीने यूपीएससीला भरती प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याची शिफारस केली आहे. सुशीलकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही नागरी सेवा परीक्षेतील उमेदवारांच्या घसरत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

संसदीय समितीच्या शिफारशी तज्ज्ञ समिती स्थापन करा : ही भरतीप्रक्रिया इंग्रजी माध्यमाच्या शहरी उमेदवारांना आणि इंग्रजी नसलेल्या ग्रामीण उमेदवारांना समान संधी देत आहे की नाही हे तपासेल. खर्चाचे औचित्य सिद्ध करा : यूपीएससीने सल्ला शुल्काच्या नावाखाली विविध खटल्यांत १०.२५ कोटी रुपये खर्च केले. खर्चाचे समर्थन करण्याबरोबरच खर्च कमी करण्याची शिफारसही समितीने केली आहे.

आघाडीच्या ५ राज्यांमध्ये आयएएस अधिकारीराज्य    मंजूर    कार्यरतउत्तर प्रदेश    ६५२    ५४८मध्य प्रदेश    ४३९    ३७०महाराष्ट्र    ४१५    ३३८तामिळनाडू    ३७६    ३२२बिहार    ३४२    २४८(देशात ६७४६ मंजूर पदे आहेत, तर ५२३१ कार्यरत आहेत.)(१ जानेवारी २०२१ पर्यंत, मंजूर आणि नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक अंतर उत्तर प्रदेशमध्ये आहे. सर्वांत कमी अंतर सिक्कीममध्ये ९ आहे. मंजूर पदे ४८ आहेत, तर सक्रिय पदे ३९ आहेत.)

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग