शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अर्थसंकल्पावरून संसदेत गदारोळ; बिहार, आंध्रवर खैरात केल्याने 'इंडिया'चा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 07:00 IST

तरतुदींत भेदभावाचा आरोप करत विरोधकांनी केला सभात्याग; अर्थमंत्री सीतारामन यांचा पलटवार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश ही दोन राज्ये वगळता इतर विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांविरुद्ध भेदभाव केल्याच्या निषेधार्थ 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी बुधवारी लोकसभा व राज्यसभेतून सभात्याग केला. त्यावर काँग्रेसने यापूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पांमध्ये सर्व राज्यांचा उल्लेख आढळत नाही, असा पलटवार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी अर्थसंकल्पीय वाटपाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी करताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ते अडथळा आणत असल्याचे निदर्शनास आणून दिले. बिर्ला व संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनामुळे खासदारांना प्रवेश करण्यात अडचण येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

राज्यांचा उल्लेख नाही याचा अर्थ योजना नाहीत असे नाही...फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात किंवा मंगळवारी संसदेत सादर केलेल्या संपूर्ण अर्थसंकल्पात अनेक राज्यांचे नाव घेतले नाही, याचा अर्थ असा नाही की सरकारी योजना राज्यांसाठी काम करत नाहीत, अशा खुलासा अर्थमंत्र्यांनी केला.

राज्यसभेतही गदारोळ'इंडिया' आघाडीच्या खासदारांची निदर्शनेकेंद्रीय अर्थसंकल्पात विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांविरुद्ध कथित भेदभाव केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी बुधवारी संसदेच्या आवारात निदर्शने केली.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खासदारांनी बुधवारी राज्यसभेतून सभात्याग केला. काँग्रेसने यापूर्वी सादर केलेल्या कोणत्याही अर्थसंकल्पांमध्ये सर्व राज्यांचा उल्लेख आढळत नाही, असा पलटवार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. सभापती जगदीप धनखड यांनी नियम २६७ अन्वये निर्धारित विषय स्थगित करून अर्थसंकल्पीय तरतुदींवर चर्चा करण्याची नोटीस फेटाळल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, बिहार आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यांसाठी निधी आणि योजना जाहीर झाल्या. इतर सर्व राज्यांचा कोणताही उल्लेख आढळला नाही.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024