शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'इच्छामरणासाठी परवानगी द्या', MBBS च्या 12 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे मागणी; नेमकं काय घडलं?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:16 IST

वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील (Saharanpur) वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इच्छा मरणाला परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रपतींकडे केली आहे. ग्लोकल मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द झाल्यामुळे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, मात्र या महाविद्यालयाला मान्यता मिळालेली नाही. कुठूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शहर दंडाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देत इच्छा मरणाला परवानगी देण्याची मागणी केली. 

मान्यता नसताना अंधारात ठेवून लाखो रुपयांची फी वसूल केली असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. सहारनपूर जिल्ह्यातील बसपाचे विधान परिषद सदस्य आणि खाण व्यावसायिक मोहम्मद इक्बाल यांची ही ग्लोकल युनिव्हर्सिटी आहे. मात्र, याला मान्यता न मिळाल्याने आता विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे. 'त्यामुळे आम्हाला इच्छा मरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. 

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जात शहर दंडाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या निवेदनात, 2016 मध्ये ग्लोकल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. आम्ही सातत्याने तीन ते चार वर्ष एमबीबीएसचा (MBBS) अभ्यास सुरू ठेवला. दोन वर्षं शिक्षण घेतल्यानंतर तीन महिन्यांतच आम्हाला डिस्चार्ज मिळाल्याचे समजले. परंतु, याबाबत कॉलेज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. 

आमच्याकडून फी वसूल केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी यानंतर न्यायालयात धाव घेतली होती, परंतु, तिथे देखील त्यांना न्याय मिळाला नाही. ग्लोकल मेडिकल कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे 30 ते 35 लाख रुपये खर्च झाले आहेत. यापुढे खर्च करण्याची आमची आता स्थिती नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी करत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश