शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 18:26 IST

"जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल."

जेव्हा भगवान श्रीकृष्णांची स्मृती आपल्या समोर येते, तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या एका हातात बासरी आहे, तर दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र आहे. केवळ बासरीने काम चालणार नाही. तर सुरक्षिततेसाठी सुदर्शनही आवश्यक आहे. तसेच, पाकिस्तान हा 'नासूर' आहे; तो माणुसकीचा 'कॅन्सर' आहे, त्याचा उपचार जगातील शक्तींना वेळेतच करावा लागेल, असे उत्तर प्रदेशची मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते सोमवारी (16 सप्टेंबर) पश्चिम त्रिपुरातील बराकथल येथे सिद्धेश्वरी मंदिरच्या उद्घाटन समारंभावेळी बोलत होते. 

योगी म्हणाले, अयोध्या, मथुरा आणि काशी हे तीन सनातन हिंदू धर्माचे महत्वाचे स्तंभ आहेत. मानबिंदू आहेत. जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल.

उत्तर प्रदेशात डबल इंजिनचे सरकार आले, सुरक्षिततेचे वातावरण मिळाले. दंगलखोरांना बुलडोजरही दिले गेले. याच बरोबर भक्तांसाठी श्री राम मंदिराचेही काम करण्यात आले."

काँग्रेसवर निशाणा -काँग्रेस पक्षावर हल्ला चढवत योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी देशाची फाळणी मान्य केली. आरएसएसने 1925 मध्येच धोका ओळखला होता. त्यांना माहीत होते की, आपण याच पद्धतीने काँग्रेसकडून चालवल्या जात असलेल्या संधीवर चालत राहिलो, तर ते देशाचे तुकडे करतील. जो विचार त्यांनी केला होता तो खरा ठरला आणि देशाचे तुकडे झाले.

तुमच्या शक्तीचा परिचय सर्वांना असायला हवा - योगी म्हणाले, "जर आपण धर्माचे रक्षण कराल, तर धर्म आपले रक्षण करेल, पण स्वार्थासाठी त्याचा वापर कराल तर तेच हाल होतील. आम्ही सशक्त भारतासाठी काम करत आहोत. त्रिपुरा स्वतंत्र राहिला कारण येथील राजाने आपल्या सामर्थ्याचा परिचय करून दिला. जो कोणी आपली शक्ती गमावून शत्रूला समजून घेणण्याची चूक करेल, त्याचे हाल आजच्या बांगलादेश प्रमाणे होतील." 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेसBJPभाजपा