शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

'योगी आदित्यनाथांना माझी हत्या करायची आहे', ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:14 IST

up assembly elections 2022 : योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे, असा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. 

लखनऊ : सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (Suheldev Bhartiya Samaj Party) अध्यक्ष ओम प्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे, असा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. 

ओम प्रकाश राजभर म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे. त्यांचे गुंड बनारसला पाठवण्यात आले होते. काही काळ्या कोटचे गुंड होते तर काही बाहेरून पाठवलेले होते. डीएम आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार लोक पोहोचवण्यात आले. निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नामांकन कक्षात उमेदवार, प्रस्तावक आणि वकील असे तीनच लोक असले पाहिजे. मात्र, फक्त तीन लोक नामांकन कक्षात जाऊ शकत, असे असताना शेकडो लोक तिथे कसे पोहोचले? असा सवाल ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.

सुरक्षा पुरवण्याची मागणीओम प्रकाश राजभर म्हणाले की, "निवडणूक आयोगाने मला सुरक्षा द्यावी, अन्यथा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ माझी हत्या करू शकतात. पण दलित-गरीब-मागासांचा हा लढा थांबणार नाही, असा इशारा मला द्यायचा आहे. मी माझ्यासारखे हजारो ओम प्रकाश राजभर निर्माण केले आहेत. एका ओम प्रकाश राजभरला मारले तर हजार ओम प्रकाश राजभर समोर येतील."

ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोपदरम्यान, 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान ओम प्रकाश राजभर यांचे हे विधान राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बोलले जात आहे. तसेच, भाजपा आरक्षण संपवत असल्याचा आरोपही ओम प्रकाश राजभर यांनी केला. बनारसला गेल्यावर लोकांनी गोंधळ घातल्याचा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला. ते लोक भाजपने पाठवलेले गुंड होते. ते माझी हत्या सुद्धा करू शकले असते, असे ओम प्रकाश राजभर म्हणाले. 

डीएम आणि पोलीस आयुक्तांना हटवण्याची मागणी ओम प्रकाश राजभर हे शिवपूर विधानसभा मतदारसंघातून आपला मुलगा अरविंद राजभर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता, त्यांना विरोध करण्यात आला आणि न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर ओम प्रकाश राजभर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि वाराणसीच्या डीएम आणि पोलिस आयुक्तांना हटवण्याची मागणी केली. तसेच, निवडणूक आयोगाकडे आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथ