शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

UP Assembly Election: 'देश शरियतने नाही तर संविधानाने चालेल', योगींचे विरोधकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 11:57 IST

UP Election: "भारतीय राज्यघटनेनुसार व्यवस्था चालली पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. वैयक्तिक श्रद्धा, मूलभूत अधिकार, आमच्या वैयक्तिक आवडी-निवडी देशावर किंवा संस्थांवर लादू शकत नाही.''

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, हा नवीन भारत शरिया कायद्यानुसार नाही तर राज्यघटनेनुसार काम करेल, असे ते म्हणाले. राज्यात सात टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात आज नऊ जिल्ह्यांतील एकूण 55 जागांसाठी मतदान होत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'गझवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणाऱ्या 'तालिबानी विचारसरणी'च्या धार्मिक कट्टरतावाद्यांनी लक्षात ठेवावं...ते राहतील किंवा न राहतील, भारत शरियतनुसार नाही, तर संविधानालानुसार चालेल. जय श्री राम!'

हा नवा भारत आहेयोगी आदित्यनाथ यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला आहे की त्यांची "80 विरुद्ध 20" ही टिप्पणी "विकासाचे समर्थन करणारे आणि प्रत्येक गोष्टीला विरोध करणारे यांच्यातला फरत दाखवणारी आहे. ते पुढे म्हणाले की, "मी पूर्ण स्पष्टपणे सांगू शकतो की, हा नवा भारत आहे. हा जगातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारत आहे. या नव्या भारतात विकास सर्वांचा असेल."

हिजाब वादावर प्रतिक्रियायावेळी त्यांनी कर्नाटकातील हिजाब वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, "भारतीय राज्यघटनेनुसार व्यवस्था चालली पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक श्रद्धा, आमचे मूलभूत अधिकार, आमच्या वैयक्तिक आवडी-निवडी देशावर किंवा संस्थांवर लादू शकत नाही मी उत्तर प्रदेशातील लोकांना आणि कार्यकर्त्यांना भगवा घालायला सांगतोय का? त्यांना काय घालायचे आहे, ही त्यांची निवड आहे. पण शाळांमध्ये ड्रेस कोड असायला हवा, हा शिस्तीचा भाग आहे'', असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथ