शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

UP Assembly Election 2022: योगींच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचं घणाघाती भाषण, म्हणाले 'उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:17 IST

UP Assembly Election 2022 : आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांचा बालेकिल्ला असलेल्या ऊत्तर प्रदेशमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख Aditya Thackeray यांनी झंझावाती सभा घेतली.

लखनौ - केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधातशिवसेना कमालीची आक्रमक झालेली आहे. त्यातच आता जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे अशा ठिकाणी शिवसेनेकडून भाजपाला आव्हान देण्याची रणनीती आखली जात आहे. काही दिवसांपूर्वीच दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केल्यानंतर शिवसेनेने गोव्यातही भाजपाच्या सत्तेला आव्हान दिले होते. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमध्येही भाजपाविरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहेत. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज येथे शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी झंझावाती सभा घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात घणाघाती भाषण करत उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असा विश्वास व्यक्त केला. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, उत्तर प्रदेशात परिवर्तनाची लाट आहे. उत्तर प्रदेशात यावेळी सत्ताबदल होणार आहे. ज्या आशेने भाजपाला सत्ता दिली होती. त्या अपेक्षांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता राज्यात परिवर्तन झाले पाहिजे. मोठे बहुमत असूनही भाजपाला जनतेच्या स्वप्नांची पूर्तता होऊ शकली नाही. पाच वर्षांत केवळ दंग्याचीच चर्चा झाली. भाजपाने केवळ घाबरवण्याची भाषा केली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसेनेचे राजकारण पाहा. राजकारण करा तेव्हा ते लोकांसाठी करा, समाजसेवेसाठी करा, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाच्या रंगाचा रंग लाल आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. त्यावेळी आम्ही सत्तेत होतो, याचं दु:ख वाटतं, अशी खंतही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशमधील सध्याचे मुख्यमंत्री जे काही दिवसांनी माजी मुख्यमंत्री बनतील. ते मुंबईत आले की मोठमोठ्या जाहिराती देतात. एवढी गुंतवणूक आली, एवढा विकास झाला, एवढे रस्ते बनले, असे दावे करतात. मात्र रोजगार वाढले आहेत की बेरोजगारी वाढली वाढली आहे, महिलांचा सन्मान वाढलाय की अन्याय वाढलाय, हेच आम्हाला बदलायचं आहे. त्यामुळेच परिवर्तनाची लाट येथे आली पाहिजे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२