शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

अवकाळी पावसाचे थैमान, वीज पडून ११ जणांचा मृत्यू; मध्य प्रदेश-महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 09:12 IST

राजस्थानात पावसामुळे दिलासा.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारमध्ये गेल्या २४ तासांत वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुढील १-२ दिवस आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे, देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. 

चांगल्या मान्सूनचे मिळाले संकेत

राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणामध्ये तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत नोंदवले जात आहे. शनिवारी महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या मान्सूनची चिन्हे आता हळूहळू मजबूत होत आहेत. चांगल्या पावसासाठी आवश्यक असलेले बदल पॅसिफिक आणि हिंद महासागरात दिसू लागले आहेत. हे मान्सूनसाठी चांगले संकेत आहेत.

राजस्थानमध्ये पावसाने दिला नागरिकांना दिलासा

जयपूर : हवामान बदलाच्या प्रभावामुळे राजस्थानच्या काही भागात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे, अशी माहिती जयपूर हवामान केंद्राने दिली. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भयंकर उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील बहुतांश भागातील नागरिकांना प्रचंड दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत देवगड, (जि. राजसमंद) येथे सर्वाधिक ४२ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच राज्यात दि. १४ मे पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे बहुतांश भागातील पारा ४२ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस