शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

अवकाळी पावसाचे थैमान, वीज पडून ११ जणांचा मृत्यू; मध्य प्रदेश-महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 09:12 IST

राजस्थानात पावसामुळे दिलासा.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारमध्ये गेल्या २४ तासांत वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुढील १-२ दिवस आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे, देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. 

चांगल्या मान्सूनचे मिळाले संकेत

राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणामध्ये तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत नोंदवले जात आहे. शनिवारी महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या मान्सूनची चिन्हे आता हळूहळू मजबूत होत आहेत. चांगल्या पावसासाठी आवश्यक असलेले बदल पॅसिफिक आणि हिंद महासागरात दिसू लागले आहेत. हे मान्सूनसाठी चांगले संकेत आहेत.

राजस्थानमध्ये पावसाने दिला नागरिकांना दिलासा

जयपूर : हवामान बदलाच्या प्रभावामुळे राजस्थानच्या काही भागात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे, अशी माहिती जयपूर हवामान केंद्राने दिली. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भयंकर उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील बहुतांश भागातील नागरिकांना प्रचंड दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत देवगड, (जि. राजसमंद) येथे सर्वाधिक ४२ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच राज्यात दि. १४ मे पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे बहुतांश भागातील पारा ४२ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस