शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अवकाळी पावसाचे थैमान, वीज पडून ११ जणांचा मृत्यू; मध्य प्रदेश-महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 09:12 IST

राजस्थानात पावसामुळे दिलासा.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारमध्ये गेल्या २४ तासांत वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुढील १-२ दिवस आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे, देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. 

चांगल्या मान्सूनचे मिळाले संकेत

राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणामध्ये तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत नोंदवले जात आहे. शनिवारी महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या मान्सूनची चिन्हे आता हळूहळू मजबूत होत आहेत. चांगल्या पावसासाठी आवश्यक असलेले बदल पॅसिफिक आणि हिंद महासागरात दिसू लागले आहेत. हे मान्सूनसाठी चांगले संकेत आहेत.

राजस्थानमध्ये पावसाने दिला नागरिकांना दिलासा

जयपूर : हवामान बदलाच्या प्रभावामुळे राजस्थानच्या काही भागात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे, अशी माहिती जयपूर हवामान केंद्राने दिली. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भयंकर उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील बहुतांश भागातील नागरिकांना प्रचंड दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत देवगड, (जि. राजसमंद) येथे सर्वाधिक ४२ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच राज्यात दि. १४ मे पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे बहुतांश भागातील पारा ४२ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस