शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

सरकारच्या पहिल्या ६ महिन्यांत सुधारणांना अभूतपूर्व गती - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:33 IST

बँकिंग क्षेत्राचे आरोग्य सुधारावे यासाठी बँकांचे महाविलीनीकरण सरकारने घोषित केले आहे.

नवी दिल्ली : आपल्या सरकारने सहा महिने पूर्ण केले असून, या काळात सरकारने सुधारणांना अभूतपूर्व गती दिली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, घटनेतील कलम ३७० रद्द करण्यापासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत, फलद्रूप सांसदीय कामकाजापासून ते निर्णायक विदेश नीतीपर्यंत अनेक ऐतिहासिक पावले आपल्या सरकारकडून उचलण्यात आली आहेत.

मोदी यांनी म्हटले की, आपल्या सरकारने ‘इंडस्ट्रीयल रिलेशन कोड’ला मंजुरी दिली, तसेच कॉर्पोरेट कर कमी करून २२ टक्क्यांवर आणला. नव्या देशांतर्गत मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी, तर १५ टक्केच कर केला. पाच सार्वजनिक उपक्रमांतील सरकारी हिस्सेदारी विकण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यात प्रशासकीय नियंत्रणाचेही हस्तांतरण होणार आहे.

बँकिंग क्षेत्राचे आरोग्य सुधारावे यासाठी बँकांचे महाविलीनीकरण सरकारने घोषित केले आहे. याशिवाय २०१९-२० या वित्त वर्षासाठी बँकांत ७० हजार कोटी रुपये ओतण्यात आले आहेत. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनीही समाजमाध्यमांवर पोस्ट टाकून सरकारच्या कामगिरीचा गुणगौरव केला आहे.पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आपल्या सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत थेट अर्थसाह्य केले आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असे वचन भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. ते सरकारने पाळले आहे. या योजनेचा लाभ मिळणाºया शेतकºयांची संख्या १४.५ कोटी आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकºयांना वर्षाला ६ हजार रुपयांचे थेट अर्थसाह्य मिळत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी