शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Coronavirus Unlock 3: राज्यांतर्गत, आंतरराज्य प्रवासावर बंधने नकोत; केंद्राच्या राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:32 IST

केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना हे पत्र लिहिले आहे. त्यात प्रवासी व मालवाहतुकीबद्दल सूचना दिल्या आहेत.

नवी दिल्ली : राज्यांतर्गत, आंतरराज्य प्रवासी व मालवाहतुकीवर कोणतीही बंधने घालण्यात येऊ नयेत, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यासंदर्भात राज्यांना एका पत्राद्वारे केल्या आहेत.

केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना हे पत्र लिहिले आहे. त्यात प्रवासी व मालवाहतुकीबद्दल सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विविध राज्यांतून तिथे होणारी प्रवासी व मालवाहतूक यांच्यासाठीही वेगळी परवानगी वा इ-परमीट यांची आवश्यकता नसेल. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बहुतांश राज्यांनी जिल्हांतर्गत तसेच दोन जिल्ह्यांत वा दोन राज्यांतील प्रवासी व मालवाहतुकीवर काही बंधने घातली होती. प्रवाशांना इ-पास सक्तीचे केले होते. त्याची दखल घेत आता अशा बंधनांची आवश्यकता नाही असे गृह मंत्रालयाने राज्यांना कळवले आहे.शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंदचशाळा, महाविद्यालये, चित्रपगृह, मेट्रो ट्रेन पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहाणार हे निश्चित आहे. मात्र काही राज्यांनी शाळा, महाविद्यालये सप्टेंबरपासून सुरू करण्यास अनुकूलता दर्शविलेली आहे.बंधनांमुळे प्रतिकूल परिणामया पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीवर राज्यांनी घातलेल्या बंधनांमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा, अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीवरही परिणाम होत आहे. अनलॉकच्या तिसºया टप्प्याच्या १ आॅगस्टपासून अमलात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्व राज्यांनी काटेकोर पालन करायला हवे.महाराष्ट्रात मात्र सध्या ई-पासची सक्ती कायमकेंद्र सरकारने आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज नाही, असे केंद्रीय गृहविभागाने कळविले असले तरी महाराष्ट्रात राज्य शासन नव्याने आदेश काढत नाही तोवर ई-पासची सक्ती कायम राहणार आहे. केंद्राच्या आदेशाने राज्यात ई-पासची सक्ती रद्द केलेली नाही.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकState Governmentराज्य सरकार