रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST
जळगाव : रेल्वे पुलावर उभ्या असलेल्या एका ३८-३९ वर्षाच्या अनोळखी तरुणाचा अप गीतांजली एक्सप्रेसच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी शनिपेठनजीकच्या रेल्वे नाल्यावर अडीच वाजेच्या दरम्यान घडली.
रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू
जळगाव : रेल्वे पुलावर उभ्या असलेल्या एका ३८-३९ वर्षाच्या अनोळखी तरुणाचा अप गीतांजली एक्सप्रेसच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी शनिपेठनजीकच्या रेल्वे नाल्यावर अडीच वाजेच्या दरम्यान घडली. जळगाव-नाशिक मार्गावरील खांब क्रमांक ४२०/२८३० जवळ एक अनोळखी तरुण नाल्यावरील छोट्या पुलावर असलेल्या रेल्वे रुळावर उभा होता. त्यावेळी गाडी क्रमांक १२८६० अप गीतांजली एक्सप्रेस येत होती. तरुण रुळावर असल्याने चालकाने बराचवेळ हॉर्न वाजविला. तरीदेखील तरुण बाजूला सरकला नाही. त्यामुळे चालकाने ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला मात्र गाडीचा धक्का तरुणाला बसून तो पुलाच्या खाली पडला व डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. त्यावेळी गाडी सोबत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे पो.कॉ. वसीम शेख व नितेश कुशवाह यांनी तरुणाला जखमी अवस्थेत रिक्षामध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी पो.कॉ. वसीम शेख यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.