शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देणारच; जेएनयू विद्यार्थी संघाने प्रशासनाचा इशारा धुडकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:45 IST

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला दिला होता.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला दिला होता. मात्र, या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत विद्यार्थी संघाने कुलगुरूंचा इशारा धुडकावून लावला आहे.प्रशासनाच्या धमक्यांवर मानवता मात करील. हिंसाचारग्रस्तांसाठी विद्यापीठ नेहमीच खुले राहील, असे विद्यार्थी संघाने म्हटले आहे. जेएनयूचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी शुक्रवारी नोटीस जारी करताना हिंसाचारातील पीडितांना आश्रय देऊ नये, असे म्हटले होते. तसेच, पीडितांना आश्रय दिल्यास शिस्तभंगाची करावाई करण्याचा इशाराही दिला होता.जेएनयूमध्ये १९८४ मध्येही हिंसाचारातील पीडितांना आश्रय देण्यात आला होता. ते आश्रयस्थान आजही खुले आहे आणि सुरू राहील, असे टष्ट्वीट जेएनयू विद्यार्थी संघाने केले आहे. कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी पीडितांना आश्रय देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तू भेट देण्याचे आवाहन केले होते.

>आप सरकारवर टीकाजेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्याने विद्यार्थी संघाने आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. अल्पकालीन राजकीय लाभासाठी दिल्ली सरकारने केलेले कृत्य दुर्दैवी आहे. कन्हैया कुमारसह दहा जणांवर चालविण्यात येणारा खटला पूर्णपणे चुकीच्या आरोपांवर असल्याचेही विद्यार्थी संघाने म्हटले आहे.