शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 05:48 IST

Farmer Protests : सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठविल्याची चर्चा आहे, परंतु संयुक्त किसान मोर्चापर्यंत अद्याप कोणताही प्रस्ताव पोहोचला नाही. कडाक्याच्या थंडीतही कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी लढा देत आहेत. परंतु सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने  त्यांचा संयम तुटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.‘लोकमत’शी बोलताना संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील म्हणाले की, सरकारने प्रस्ताव पाठवल्याच्या बातम्या माध्यमातूनच मिळत आहेत. परंतु आमच्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला तर आम्ही चर्चा करू. तिन्ही कायद्यावर याआधी चर्चा झाली आहे. त्यामुळे तो विषय सोडून थेट ‘एमएसपी’वर चर्चा करू. आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूचनाशिक : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली. 

साखळी उपवास आंदोलन - गेले २६ दिवस अत्यंत संयमाने आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवर बसून आहेत. मात्र, थंडीचा जोरात मार बसत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आंदोलना दरम्यान ३३ शेतकऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि अन्य काही मार्ग अडवलेत. विविध सीमेवर शेतकऱ्यांनी २४ तासांचे उपवास सुरू केले आहे. उपवासाची श्रृंखला आंदोलन असेपर्यंत ठेवली जाणार आहे. सोनीपथ येथे कुंडली सीमेवर आज ६५ वर्षीय निरंजन सिंह या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्ली