शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 05:48 IST

Farmer Protests : सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठविल्याची चर्चा आहे, परंतु संयुक्त किसान मोर्चापर्यंत अद्याप कोणताही प्रस्ताव पोहोचला नाही. कडाक्याच्या थंडीतही कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी लढा देत आहेत. परंतु सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने  त्यांचा संयम तुटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.‘लोकमत’शी बोलताना संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील म्हणाले की, सरकारने प्रस्ताव पाठवल्याच्या बातम्या माध्यमातूनच मिळत आहेत. परंतु आमच्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला तर आम्ही चर्चा करू. तिन्ही कायद्यावर याआधी चर्चा झाली आहे. त्यामुळे तो विषय सोडून थेट ‘एमएसपी’वर चर्चा करू. आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूचनाशिक : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली. 

साखळी उपवास आंदोलन - गेले २६ दिवस अत्यंत संयमाने आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवर बसून आहेत. मात्र, थंडीचा जोरात मार बसत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आंदोलना दरम्यान ३३ शेतकऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि अन्य काही मार्ग अडवलेत. विविध सीमेवर शेतकऱ्यांनी २४ तासांचे उपवास सुरू केले आहे. उपवासाची श्रृंखला आंदोलन असेपर्यंत ठेवली जाणार आहे. सोनीपथ येथे कुंडली सीमेवर आज ६५ वर्षीय निरंजन सिंह या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्ली