शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 05:48 IST

Farmer Protests : सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठविल्याची चर्चा आहे, परंतु संयुक्त किसान मोर्चापर्यंत अद्याप कोणताही प्रस्ताव पोहोचला नाही. कडाक्याच्या थंडीतही कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी लढा देत आहेत. परंतु सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने  त्यांचा संयम तुटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.‘लोकमत’शी बोलताना संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील म्हणाले की, सरकारने प्रस्ताव पाठवल्याच्या बातम्या माध्यमातूनच मिळत आहेत. परंतु आमच्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला तर आम्ही चर्चा करू. तिन्ही कायद्यावर याआधी चर्चा झाली आहे. त्यामुळे तो विषय सोडून थेट ‘एमएसपी’वर चर्चा करू. आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूचनाशिक : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली. 

साखळी उपवास आंदोलन - गेले २६ दिवस अत्यंत संयमाने आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवर बसून आहेत. मात्र, थंडीचा जोरात मार बसत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आंदोलना दरम्यान ३३ शेतकऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि अन्य काही मार्ग अडवलेत. विविध सीमेवर शेतकऱ्यांनी २४ तासांचे उपवास सुरू केले आहे. उपवासाची श्रृंखला आंदोलन असेपर्यंत ठेवली जाणार आहे. सोनीपथ येथे कुंडली सीमेवर आज ६५ वर्षीय निरंजन सिंह या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्ली