शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना मुंबई दूरच

By admin | Updated: September 23, 2014 04:30 IST

युती होईल की तुटेल या प्रश्नांच्या जंजाळात राज्यच नव्हे तर केंद्राचे राजकारणही अडकले असताना, केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री या वातावरणापासून चार हात लांबच

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीयुती होईल की तुटेल या प्रश्नांच्या जंजाळात राज्यच नव्हे तर केंद्राचे राजकारणही अडकले असताना, केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री या वातावरणापासून चार हात लांबच आहेत. सध्या मंत्रालयातच थांबा, १ आॅक्टोबरनंतरच जबाबदारी दिली जाईल, असे सांगण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. विशेष म्हणजे, जागा वाटपाच्याच नव्हे, तर युती टिकवण्यासाठी पक्ष ‘दंडबैठका’ काढत असताना, महत्त्वाच्या समित्यांवर असलेले नितीन गडकरी वगळता अन्य तीन मंत्र्यांना राज्यातील कोणत्याही विषयात सहभागीही करून घेण्यात आलेले नाही. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर केंद्रातील मंत्र्यांना राज्यात पाठविण्याची योजना केंद्र सरकारची होती. तशी चाचपणी करून मागील दोन महिने काही मंत्री राज्यात पाठविण्यातही आले होते. पण प्रत्यक्षात निवडणुकीच्या तोंडावर गडकरी वगळता, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे यांना अजून एकही जबाबदारी सोपविण्यात आलेली नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. शिवसेना-भाजपाचा तिढा सुटत नसल्याने केंद्रीय मंत्री किती काळजीत असतील याचा धांडोळा घेतला तेव्हा दिसून आले, की पक्षाने त्यांना हस्तक्षेप करू नका, कोणतेही विधान करू नका, कोणतीही जबाबदारी घेऊ नका, कोणाचीच शिफारस करू नका या चतुसूत्रीवर कायम राहण्याची सूचना केली. त्यामुळे माहिती प्रसारणमंत्री जावडेकर अमेरिकेत एका परिषदेसाठी गेले आहेत. ते २५ला पहाटे भारतात परततील. सार्वजनिक अन्न वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे चार दिवसांपासून जालना, लातूर व भोकरदन भागात फिरत आहेत. भोकरदनमधून त्यांचे चिरंजीव संतोष यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाकडे प्रयत्न केले, ते फळास येत असल्याने ते दोन दिवसांच्या भोकरदन दौऱ्यावर गेले. ऊर्जा व कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल हे मोदी यांच्या मर्जीतील मानले जातात. पक्षाचे कोषाध्यक्ष होते. ते मूळचे मुंबईचे असल्याने दोन दिवस मुंबईस जाऊन आले खरे, पण सध्या दिल्लीतच आहेत. आज दिवसभर त्यांनी कार्यालयातच घालविला. कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य त्यांना करायचे नाही. ११, अशोक रोड या भाजपाच्या केद्रीय कार्यालयात राज्याच्या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता आहे; आणि युती होत नसल्याने काळजीही व्यक्त होते. सध्या तरी येथे वादळापूर्वीची शांतता आहे.