शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना मुंबई दूरच

By admin | Updated: September 23, 2014 04:30 IST

युती होईल की तुटेल या प्रश्नांच्या जंजाळात राज्यच नव्हे तर केंद्राचे राजकारणही अडकले असताना, केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री या वातावरणापासून चार हात लांबच

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीयुती होईल की तुटेल या प्रश्नांच्या जंजाळात राज्यच नव्हे तर केंद्राचे राजकारणही अडकले असताना, केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री या वातावरणापासून चार हात लांबच आहेत. सध्या मंत्रालयातच थांबा, १ आॅक्टोबरनंतरच जबाबदारी दिली जाईल, असे सांगण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. विशेष म्हणजे, जागा वाटपाच्याच नव्हे, तर युती टिकवण्यासाठी पक्ष ‘दंडबैठका’ काढत असताना, महत्त्वाच्या समित्यांवर असलेले नितीन गडकरी वगळता अन्य तीन मंत्र्यांना राज्यातील कोणत्याही विषयात सहभागीही करून घेण्यात आलेले नाही. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर केंद्रातील मंत्र्यांना राज्यात पाठविण्याची योजना केंद्र सरकारची होती. तशी चाचपणी करून मागील दोन महिने काही मंत्री राज्यात पाठविण्यातही आले होते. पण प्रत्यक्षात निवडणुकीच्या तोंडावर गडकरी वगळता, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे यांना अजून एकही जबाबदारी सोपविण्यात आलेली नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. शिवसेना-भाजपाचा तिढा सुटत नसल्याने केंद्रीय मंत्री किती काळजीत असतील याचा धांडोळा घेतला तेव्हा दिसून आले, की पक्षाने त्यांना हस्तक्षेप करू नका, कोणतेही विधान करू नका, कोणतीही जबाबदारी घेऊ नका, कोणाचीच शिफारस करू नका या चतुसूत्रीवर कायम राहण्याची सूचना केली. त्यामुळे माहिती प्रसारणमंत्री जावडेकर अमेरिकेत एका परिषदेसाठी गेले आहेत. ते २५ला पहाटे भारतात परततील. सार्वजनिक अन्न वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे चार दिवसांपासून जालना, लातूर व भोकरदन भागात फिरत आहेत. भोकरदनमधून त्यांचे चिरंजीव संतोष यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाकडे प्रयत्न केले, ते फळास येत असल्याने ते दोन दिवसांच्या भोकरदन दौऱ्यावर गेले. ऊर्जा व कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल हे मोदी यांच्या मर्जीतील मानले जातात. पक्षाचे कोषाध्यक्ष होते. ते मूळचे मुंबईचे असल्याने दोन दिवस मुंबईस जाऊन आले खरे, पण सध्या दिल्लीतच आहेत. आज दिवसभर त्यांनी कार्यालयातच घालविला. कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य त्यांना करायचे नाही. ११, अशोक रोड या भाजपाच्या केद्रीय कार्यालयात राज्याच्या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता आहे; आणि युती होत नसल्याने काळजीही व्यक्त होते. सध्या तरी येथे वादळापूर्वीची शांतता आहे.