शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उत्तर प्रदेशचे विभाजन होणार? केंद्रीय मंत्र्यांनी सूचवले ‘राजधानी’चे नाव! नेमके प्रकरण पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 17:31 IST

ऐन निवडणुकांच्या धामधुमीत केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या विभाजनाची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

UP West Separate News: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांसह काही राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच उत्तर प्रदेश विभाजनाचा मुद्दा समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे विभाजन करण्यात यावे. पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग वेगळा करावा, अशी मागणी चक्क एका केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर पश्चिम उत्तर प्रदेशची राजधानी कोणती असेल, याचे नावही सूचवले आहे. या केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे विभाजन करण्याच्या मागणीची काही कारणेही सांगितली आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बालियान यांनी पश्चिम उत्तर प्रदेशला नवीन राज्य करण्याची मागणी केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य बनवून मेरठला त्याची राजधानी घोषित करण्यात यावे, असे बालियान यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य करण्याची मागणी गेल्या अनेक काळापासून केली जात आहे. 

पश्चिम उत्तर प्रदेश नवे राज्य का हवे?

संजीव बालियान यांनी आंतरराष्ट्रीय जाट संसदेत सांगितले की, येथील लोकसंख्या आठ कोटी आहे आणि उच्च न्यायालय येथून ७५० किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत वेगळ्या राज्याची मागणी पूर्णपणे न्याय्य आहे, असे मत बालियान यांनी व्यक्त केले. जाट हे राष्ट्रवादी समुदाय असल्याचे सांगताना संजीव बालियान म्हणाले की, राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. जाटांशिवाय कोणीही गावाचा प्रमुख होऊ शकत नाही. सरकारने जाट आरक्षणासाठी बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडली नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. भविष्यात जो कोणी आरक्षणावर बोलेल त्याला पाठिंबा देईन, असे आश्वासन बालियान यांनी दिले. मात्र, बालियान यांच्या या मागणीला अनेकांनी विरोध दर्शवला. 

दरम्यान, बैठकीत ओबीसी प्रवर्गाला केंद्रात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. बेगम पुल रॅपिड स्टेशनला चौधरी चरणसिंग असे नाव देण्याचीही मागणी करण्यात आली. त्याचबरोबर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, सर छोटू राम आणि राजा महेंद्रसिंग यांना भारतरत्न द्यावा आणि देशाच्या नवीन संसद भवनात महाराजा सूरजमल यांचे स्मारक उभारावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ