शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उत्तर प्रदेशचे विभाजन होणार? केंद्रीय मंत्र्यांनी सूचवले ‘राजधानी’चे नाव! नेमके प्रकरण पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 17:31 IST

ऐन निवडणुकांच्या धामधुमीत केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या विभाजनाची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

UP West Separate News: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांसह काही राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच उत्तर प्रदेश विभाजनाचा मुद्दा समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे विभाजन करण्यात यावे. पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग वेगळा करावा, अशी मागणी चक्क एका केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर पश्चिम उत्तर प्रदेशची राजधानी कोणती असेल, याचे नावही सूचवले आहे. या केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे विभाजन करण्याच्या मागणीची काही कारणेही सांगितली आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बालियान यांनी पश्चिम उत्तर प्रदेशला नवीन राज्य करण्याची मागणी केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य बनवून मेरठला त्याची राजधानी घोषित करण्यात यावे, असे बालियान यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य करण्याची मागणी गेल्या अनेक काळापासून केली जात आहे. 

पश्चिम उत्तर प्रदेश नवे राज्य का हवे?

संजीव बालियान यांनी आंतरराष्ट्रीय जाट संसदेत सांगितले की, येथील लोकसंख्या आठ कोटी आहे आणि उच्च न्यायालय येथून ७५० किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत वेगळ्या राज्याची मागणी पूर्णपणे न्याय्य आहे, असे मत बालियान यांनी व्यक्त केले. जाट हे राष्ट्रवादी समुदाय असल्याचे सांगताना संजीव बालियान म्हणाले की, राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. जाटांशिवाय कोणीही गावाचा प्रमुख होऊ शकत नाही. सरकारने जाट आरक्षणासाठी बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडली नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. भविष्यात जो कोणी आरक्षणावर बोलेल त्याला पाठिंबा देईन, असे आश्वासन बालियान यांनी दिले. मात्र, बालियान यांच्या या मागणीला अनेकांनी विरोध दर्शवला. 

दरम्यान, बैठकीत ओबीसी प्रवर्गाला केंद्रात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. बेगम पुल रॅपिड स्टेशनला चौधरी चरणसिंग असे नाव देण्याचीही मागणी करण्यात आली. त्याचबरोबर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, सर छोटू राम आणि राजा महेंद्रसिंग यांना भारतरत्न द्यावा आणि देशाच्या नवीन संसद भवनात महाराजा सूरजमल यांचे स्मारक उभारावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ