शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

“इंडिया आघाडीत दम राहिलेला नाही, कालांतराने केवळ काँग्रेसच शिल्लक राहील”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:21 IST

Ramdas Athawale News: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ३० जागा मिळतील, असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.

Ramdas Athawale News: बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीश कुमार यांनी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपाच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरून विरोधक तसेच इंडिया आघाडीतील अनेक नेते नितीश कुमार आणि भाजपावर टीका करत आहे. तर, भाजपा नेते याला प्रत्युत्तर देत आहेत. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहारमधील सत्तांतरावर प्रतिक्रिया देताना, काँग्रेसवर निशाणा साधला.

मीडियाशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४४ जागा मिळाल्या होत्या. आता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३० जागांवर समाधान मानावे लागेल. एनडीए मोठा विजय साजरा करेल, असा मोठा दावा रामदास आठवले यांनी केला.

शेवटी फक्त काँग्रेसच शिल्लक राहील

नितीश कुमार हे इंडिया आघाडीतील सर्वांत मोठे चेहरे होते. नितीश कुमार हे आता एनडीएसोबत आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. पंजाब आणि हरियाणा येथे आम आदमी पक्ष लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये आता काही दम राहिलेला नाही. हळूहळू करून इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष दूर होतील आणि शेवटी फक्त काँग्रेसच शिल्लक राहील, या शब्दांत रामदास आठवले यांनी टीका केली.

दरम्यान, नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडींबाबत जोरदार चर्चा सुरू होती. इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दोन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसोबत जाण्यामागे बोलली जात आहेत.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी