शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

“इंडिया आघाडीत दम राहिलेला नाही, कालांतराने केवळ काँग्रेसच शिल्लक राहील”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:21 IST

Ramdas Athawale News: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ३० जागा मिळतील, असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.

Ramdas Athawale News: बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीश कुमार यांनी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपाच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरून विरोधक तसेच इंडिया आघाडीतील अनेक नेते नितीश कुमार आणि भाजपावर टीका करत आहे. तर, भाजपा नेते याला प्रत्युत्तर देत आहेत. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहारमधील सत्तांतरावर प्रतिक्रिया देताना, काँग्रेसवर निशाणा साधला.

मीडियाशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४४ जागा मिळाल्या होत्या. आता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३० जागांवर समाधान मानावे लागेल. एनडीए मोठा विजय साजरा करेल, असा मोठा दावा रामदास आठवले यांनी केला.

शेवटी फक्त काँग्रेसच शिल्लक राहील

नितीश कुमार हे इंडिया आघाडीतील सर्वांत मोठे चेहरे होते. नितीश कुमार हे आता एनडीएसोबत आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. पंजाब आणि हरियाणा येथे आम आदमी पक्ष लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये आता काही दम राहिलेला नाही. हळूहळू करून इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष दूर होतील आणि शेवटी फक्त काँग्रेसच शिल्लक राहील, या शब्दांत रामदास आठवले यांनी टीका केली.

दरम्यान, नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडींबाबत जोरदार चर्चा सुरू होती. इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दोन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसोबत जाण्यामागे बोलली जात आहेत.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी