शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लूची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 21:36 IST

बॉलिवूड अभिनेता आमिर खान, त्याची पत्नी किरण राव आणि अभिनेत्री रिचा चड्ढा यांच्यानंतर आता  केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना स्वाईन फ्लूची लागण

नवी दिल्ली, दि. 10 - बॉलिवूड अभिनेता आमिर खान, त्याची पत्नी किरण राव आणि अभिनेत्री रिचा चड्ढा यांच्यानंतर आता  केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्वाईन फ्लूने त्यांना ग्रासलं असल्याची माहिती आहे. सध्या जावडेकर आपल्या घरातच असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  त्यांना भेटायची परवानगी कोणालाही दिली जात नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  स्वाईन फ्लूमुळे जावडेकर गेले दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत.

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता आमीर खानने आपल्याला आणि पत्नी किरण रावला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनाही स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.तसंच अभिनेत्री रिचा चढ्ढालाही स्वाईन फ्लू झाला आहे. 

दिल्ली आणि मुंबईत स्वाईन फ्लूचे अनेक रूग्ण आढळत आहेत.  देशभरात स्वाईन फ्लूचा कहर माजला आहे, 2017 मध्ये जून महिन्याच्या अखेरपर्यंत 13 हजार 188  लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. तर देशभरात स्वाईन फ्लूमुळे 630 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यू होण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे.

आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण- 

बॉलिवूड अभिनेता आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.  त्याने स्वत:ही माहिती दिली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला. यावेळी त्यानं आपल्या अनुपस्थितीबाबत सांगताना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती दिली. याच कार्यक्रमात आमिरनं त्याची पत्नी किरण रावलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं सांगितलं. स्वाईन फ्लू झालेल्या रूग्णाला आराम करण्याची आणि औषधं घेण्याची आवश्यकता असते. त्याचमुळे आपण पाणी फाऊंडेशच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात हजर राहू शकलो नाही असं आमिर खाननं म्हटलं आहे. तसंच सगळ्या विजेत्यांचे त्यानं आभारही मानले आहेत

पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील 13 जिल्ह्यांतील 30 तालुक्यामधील 1300 पेक्षा अधिक गावांमध्ये घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम सुरु आहे. या समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अतुल कुलकर्णी, शाहरुख खानसह दिग्गज उपस्थित होते.

बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपरयातून नागरिक आले आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केलं. पाणी फाऊंडेशनच्या कामातून अशक्य ते शक्य केलं. मराठी माणूस जे बोलतो ते करून दाखवतो. महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठं काम झालं आहे. रिलायन्स फाऊंडेशन यापुढंही मदत करणार असल्याचे यावेळी निता अंबानी यांनी स्पष्ट केलं.