शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

"राष्ट्रीय हितासाठी आवश्यक पावले उचलू"; ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ बॉम्बवर काय म्हणाले सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:19 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के करवाढीबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत निवेदन दिले.

Piyush Goel on Trump Tarrif: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा बुधवारी केली. ट्रम्प यांनी भारतावर दंड आकारण्याची धमकीही दिली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतातील व्यापाराची चिंता वाढली आहेत. दुसरीकडे, लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या २५ टक्के आयात शुल्कावर सरकारची भूमिका मांडली. भारत सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि देशांतर्गत उद्योगांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. 

भारत आमचा मित्र आहे, असा उल्लेख करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरच २५ टक्के टॅरिफचा बॉम्ब टाकला. १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावले जाईल, असं ट्रम्प म्हणाले. दोन्ही देशांतील व्यापार कराराच्या वाटाघाटी काही मुद्यांवर अडल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. रशियाकडून लष्करी साहित्य व तेलाची खरेदी तसेच द्विपक्षीय व्यापारातील अडथळे यामुळे भारताला दंडही लावला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने भारतीय उद्योगांवर मोठे संकट आले आहे. त्यानंतर आता सरकारने याबाबत भाष्य केलं. 

"२ एप्रिल २०२५ रोजी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर करांबाबत एक कार्यकारी आदेश जारी केला होता. ५ एप्रिल २०२५ पासून १० टक्के बेसलाइन टॅरिफ लागू झाला. १० टक्के बेसलाइन टॅरिफसह भारतासाठी एकूण २६ टक्के टॅरिफ जाहीर करण्यात आला होता. हा अतिरिक्त टॅरिफ ९ एप्रिल २०२५ रोजी लागू होणार होता. पण १० एप्रिल २०२५ रोजी, सुरुवातीला तो ९० दिवसांसाठी वाढवण्यात आला आणि नंतर १ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आला," असं पियुष गोयल यांनी म्हटलं. 

"दोन्ही बाजूंमध्ये द्विपक्षीय बैठकांच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्यात. टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेसोबत द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत. आम्ही व्यावसायिक आणि भागधारकांशी बोलत आहोत. जागतिक व्यापारात भारताचे १६ टक्के योगदान आहे. राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलणार आहोत," असेही पियुष गोयल म्हणाले.

तसेच "एका दशकापेक्षा कमी कालावधीत, भारत जगातील कमकुवत अर्थव्यवस्थांमधून बाहेर पडून एक मोठी अर्थव्यवस्था आणि जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे. युएई, यूके, ऑस्ट्रेलियासोबत व्यापार करार झाले आहेत. आम्ही इतर देशांसोबत अशाच प्रकारच्या करारांसाठी वचनबद्ध आहोत," असं पियुष गोयल  यांनी म्हटलं.

दरम्यान, अमेरिका राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या वक्तव्याची भारत सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्याचे संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांचे हित जपणे आणि त्यांना चालना देणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल आणि याआधी युकेसोबतच्या करारासारखेच प्रयत्न केले जातील, असे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं होतं.

टॅग्स :ParliamentसंसदDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पpiyush goyalपीयुष गोयल