शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ठरल्यावेळीच, केंद्रीय मंत्री गोयल यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 05:59 IST

उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची चर्चा सुरू असल्याची अटकळ बांधली जात असताना पीयूष गोयल यांनी अशा शक्यता फेटाळून लावत सांगितले की, असे काहीही नाही. 

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घेण्याची अलीकडे जोरदार चर्चा होती. मात्र, सरकारला कोणतीही घाई नसून राज्यातील विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. येथे एका अनौपचारिक संवादात त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारला निवडणुकीची घाई नाही. ज्यांना निवडणुकीची घाई आहे, त्यांनी निवडणुका घ्याव्यात. भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वेळेपूर्वी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप आणि शिवसेना सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळेवरच होतील, असे गोयल यांनी स्पष्ट केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आतापासूनच कामाला लागला असून अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळेही दोन्ही निवडणुका एकत्र होतील की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.

विरोधकांचे परस्परभिन्न दावेकाही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, केंद्र सरकारही वेळेपूर्वी निवडणुका घेऊ शकते, असे वक्तव्य केले होते. विराेधी पक्षांचे सामर्थ्य कमी करण्यासाठी केंद्र सरकार असे पाउल उचलू शकते, असा दावा त्यांनी केला हाेता. देशात विविध राज्यांचे चित्र बदलत असून सत्ताधारी पक्षाला मतदार जागा दाखवित असल्यामुळे माेदी सरकार लाेकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतील, असे वाटत नसल्याचे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला हाेता. 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा नाही -  उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची चर्चा सुरू असल्याची अटकळ बांधली जात असताना पीयूष गोयल यांनी अशा शक्यता फेटाळून लावत सांगितले की, असे काहीही नाही. - उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची कोणतीही चर्चा होत नाही. २० जूनला संजय राऊत यांच्याकडून गद्दार दिवस नाव दिल्याच्या मुद्द्यावर पीयूष गोयल म्हणाले की, आपल्या अशा विधानांमुळेच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना कोठून कोठे पोहाेचविले आहे. - गद्दारी कोणी कोणाशी केली हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. निवडणुका लढविल्या भाजपसोबत आणि सरकार बनविले काँग्रेससोबत.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलVidhan Parishadविधान परिषद