शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेला भाजप ३०३ वरून २४० वर कसा आला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 08:37 IST

एका मुलाखतीदरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या जागा कमी होण्याचे कारण स्पष्ट केलं आहे.

Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा फारसे चांगले यश मिळवता आलं नाही. ४०० पारची घोषणा देणाऱ्या एनडीएला मोठी कसरत करावी लागली. भाजपसह अनेक पक्षांनी या निकालाची कारणे सांगितली. विरोधकांचा प्रचार, फेक नरेटिव्ह, संविधानात बदल अशा गोष्टीमुळे भाजपला मोठा फटका बसल्याचे म्हटलं गेलं. आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण केलं आहे. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्याचं कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी मतदारांना गोंधळात टाकल्याचा आरोप मंत्री नितीन गडकरी यांनी केला. जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकला नाही आणि केवळ २४० जागा जिंकू शकला. तर २०१९ मध्ये भाजप पक्षाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी यांनी या निकालाबाबत भाष्य केलं.

विरोधकांनी भीती निर्माण केली - नितीन गडकरी

"ही निवडणूक एकतर मतं लोकांना पटवणारी किंवा गोंधळात टाकणारी होती. सुरुवातीला विरोधकांनी मतदारांचा भ्रमनिरास करण्यासाठी कुजबुज सुरू केली होती. भाजप डॉ.भीमराव आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असून संविधान बदलणार असल्याचे विरोधकांनी सांगितले. त्यांच्या नेत्यांनी, विशेषत: मागासवर्गीयांमध्ये भीती निर्माण केली की, त्यांना मिळत असलेले फायदे यापुढे राहणार नाहीत. दुसरे म्हणजे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही केलेल्या उपाययोजना त्यांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले," असं नितीन गडकरी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या सरकारची १० वर्षे देशासाठी सुवर्ण वर्षे

"लोकसभा निवडणूक हा भारताचा विजय होता असे मला वाटते. भाजप सरकारमध्ये परतला आणि मला १०० टक्के विश्वास आहे की आगामी चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले बहुमत मिळेल. भाजप सक्षम आहे, त्याचा रेकॉर्ड चांगला आहे आणि तो या देशाचे भविष्य बदलू शकतो, असा विश्वास जनतेने पुन्हा दाखवला आहे. तुम्ही काँग्रेसच्या ६० वर्षांच्या आणि भाजपच्या १५ वर्षांच्या कामगिरीची तुलना करू शकता. तुम्हाला उत्तर मिळेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची १० वर्षे देशाच्या इतिहासातील विकास, अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक या सर्व बाबतीत सुवर्ण वर्षे आहेत. आमच्या सरकारने पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण अशा पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. त्याशिवाय आपल्याकडे उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि रोजगार होऊ शकत नाहीत किंवा गरिबी हटवता येणार नाही," असंही नितीन गडकरी म्हणाले.

विरोधकांकडून पंतप्रधानपदाची ऑफर

दरम्यान, निवडणुकीपूर्वी मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. “मला चांगलं लक्षात आहे, मी कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल? तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी मूल्यं, विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे. भारतीय लोकशाहीचा आधार असलेली ही मूल्यं आहेत.” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी