शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून परदेशातील अनेक भारतीय गोमांस खातात; केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे वादग्रस्त विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:46 IST

खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगवतगीता श्लोक शिकवले पाहिजे.

ठळक मुद्दे...तर सरकार हिंदू अजेंडा पुढे नेत आहे असा आरोप करण्यात येईलखासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगवतगीता श्लोक शिकवले पाहिजे. या मुलांवर लहानपणापासून संस्कार होणं गरजेचे आहे.

बेगुसराय - नेहमी वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री आणि बिहारच्या बेगुसरायचे भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मिशनरी शाळांमध्ये शिक्षण घेऊन विदेशात जाणारे अनेक भारतीय गोमांस खातात. त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी खासगी शाळांमध्ये भगवतगीता पठन शिकविलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना गिरिराज सिंह यांनी सांगितले की, खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगवतगीता श्लोक शिकवले पाहिजे. त्याचसोबत शाळेत मंदिर असायला हवं. मिशनरी शाळेत शिकून विद्यार्थी अनेक मोठ्या पदांवर जातात. हीच मुले परदेशात गेल्यानंतर गोमांस खातात. त्यांना हिंदू संस्कार दिले जात नाहीत. त्यामुळे या मुलांवर लहानपणापासून संस्कार होणं गरजेचे आहे. त्यामुळे भगवत गीता श्लोक आणि हनुमान चालिसा यांना शिकविण्यात यावं असं त्यांनी सांगितले. 

भागवत कथा या कार्यक्रमाच्या उद्धाटन सोहळ्यात ते बोलत होते. सरकारी शाळांमध्ये जर गीता श्लोक आणि हनुमान चालिसा शिकविण्यास सुरुवात केली तर अनेकांकडून सरकारवर टीका होईल. सरकार हिंदू अजेंडा पुढे नेत आहे असा आरोप करण्यात येईल त्यामुळे याची सुरुवात खासगी शाळांमधून करण्यात यावी असं गिरिराज सिंह यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह नेहमी वादग्रस्त विधान करण्यासाठी ओळखले जातात. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करताना जर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला नाही तर देशात सामाजिक समतोल बिघडेल. तसेच देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या कमी होत आहे असं त्यांनी सांगितले होते. यावेळी गिरिराज सिंह यांनी सांगितले होते की, १९४७ मध्ये ३३ कोटी लोकसंख्या होती. आज १२५ कोटी देशाची अधिकृत लोकसंख्या आहे. मात्र हा आकडा १३६ कोटींच्या वर गेला आहे. देशातील ५४ जिल्ह्यात हिंदूंच्या संख्येत घट होत आहे असं विधान त्यांनी केलं होतं. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विधानावरुन अनेकदा विरोधी पक्षांकडून भाजपाला टार्गेट करण्यात आलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाHinduहिंदूbeefगोमांस