शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

'मी आयुष्यात कधीही कांद्याची चव चाखलेली नाही'; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 19:09 IST

काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही.

नवी दिल्ली: देशभरात कांद्याचे दर वाढल्याने विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे कांद्याच्या वाढत्या दरामुळे आर्थिक गणित देखील कोलमडलं आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून सरकारकडून यावर कोणत ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र कांद्याच्या बाबतीत केंद्रीय मंत्र्यांकडून वेगवेगळे वक्तव्य केले जात असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कांदे दरवाढच्या प्रश्नावर मी फार लसूण, कांदा खात नाही. आमच्या कुटुंबातही कांदा, लसूण फारसा खाल्ला जात नाही असं विधान केलं होतं. यानंतर निर्मला सीतारामन यांच्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यातच आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी मी आयुष्यात कधीही कांद्याची चव चाखलेली नसल्याने कांद्याचा भाव काय आहे हे मला कसं कळणार असं अजब विधान केल्यामुळे निर्मला सीतारामन यांच्यानंतर आता अश्विनी चौबे यांना ट्रोल करण्यात येत आहे.

देशातील कांद्याची एकूण मागणी आणि देशांतर्गत कांद्याचा साठा यात पडलेला खड्डा या आयातीमुळे भरून निघालेला नाही. त्यामुळेच सध्या कांद्याने कुठे प्रति किलो दीडशेचा टप्पा गाठला आहे तर बऱ्याच ठिकाणी शंभरी पार केली आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये निर्यात शुल्कवाढ जशी उपयुक्त ठरली नाही तशीच आता केलेली आयातही तूर्त तरी निष्प्रभ ठरली आहे.  किरकोळ बाजारात १००-१२० रुपये किलो दरानं नागरिकांना विकत घ्यावा लागतोय. तसेच कांद्याचा सध्याचा दर हा गेल्या 70 वर्षांतील उच्चांक म्हटला जात आहे. 

टॅग्स :onionकांदाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्था