शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

“राहुल गांधींनी अन् काँग्रेस पक्षाने माफी मागावी”; ‘त्या’ विधानावरून किरेन रिजिजू आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:18 IST

Parliament No-confidence Motion Debate: ईशान्य भारताच्या परिस्थितीला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार असल्याची टीका किरेन रिजिजू यांनी केली.

Parliament No-confidence Motion Debate: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर दुसऱ्या दिवशी चर्चा केली जात आहे. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर लोकसभेत येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. मणिपूर हिंसाचारावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. यावर केंद्रीय मंत्री यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने माफी मागावी, अशी आग्रही मागणी केली. 

काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आमचे पंतप्रधान गेले नाहीत, आजही गेले नाहीत, कारण त्यांच्यासाठी मणिपूर हा भारत नाही. मी 'मणिपूर' हा शब्द वापरला, पण सत्य हे आहे की, मणिपूर आता राहिले नाही. तुम्ही मणिपूरचे दोन तुकडे केले आहेत. तुम्ही मणिपूरचे विभाजन करून तोडले आहे. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या तुम्ही केली, तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही देशभक्त नाहीत. तुम्हाला देशाबद्दल प्रेम नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले. यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेत राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली.

राहुल गांधींनी अन् काँग्रेस पक्षाने माफी मागावी

राहुल गांधींच्या विधानानंतर किरेन रिजिजू उभे राहिले. तुम्ही हे नक्की काय बोलताय. राहुल गांधी यांनी सभागृहात जी भाषा वापरली आहे, जी विधाने केली आहेत, त्यावर राहुल गांधी यांना प्रश्न विचारायचा आहे, गेल्या अनेक वर्षांपासून ईशान्य भारत धुमसतोय, अनेक हत्या होत आहेत, याला जबाबदार काँग्रेस पक्ष आहे. राहुल गांधी यांनी या विधानाबाबत माफी मागितली पाहिजे. ६० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसने देशावर राज्य केले आहे. ईशान्य भारताची आताची परिस्थिती जी आहे, त्याला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार आहे. ईशान्य भारतात जेवढ्या दहशतवादी संघटना, नक्षलवादी संघटना कार्यरत आहेत, त्याला काँग्रेस जबाबदार आहे, असा पलटवार किरेन रिजिजू यांनी केला. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर लोकसभेत एकच गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. लोकसभा अध्यक्ष यांनी सदस्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सदस्यांची वागणूक योग्य नसल्याचे सांगितले. तरीही लोकसभेतील सदस्य आक्रमक होत होते. राहुल गांधी आपले भाषण संपल्यानंतर लोकसभेतून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRahul Gandhiराहुल गांधी