शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

५ कोटी प्रलंबित खटले चिंताजनक: कायदामंत्री; रिक्त जागा हे कारण: सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 08:41 IST

मोदी सरकारमधील कायदामंत्री आणि देशाचे सरन्यायाधीश यांच्यात नेमका काय संवाद झाला? वाचा

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क

चंडीगड: भारताचे कायदामंत्री किरण रिजीजू आणि सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे जयपूर येथे अखिल भारतीय विधि सेवा प्राधिकरण सदस्यांच्या संमेलनात उपस्थित होते. कायदामंत्र्यांनी न्यायालयीन कामकाजाबद्दल  व्यक्त केलेल्या अपेक्षांना सरन्यायाधीशांनी न्यायालयाच्या अडचणी मांडून उत्तर दिले. कायदामंत्र्यांनी देशातील न्यायालयांत  ५ कोटींहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्याला उत्तर देताना  न्यायालयीन रिक्त पदे न भरणे हे देशातील खटले प्रलंबित राहण्याचे प्रमुख कारण आहे असे सांगितले.

कायदेमंत्र्यांनी तुरुंगात मोठ्या संख्येने असलेल्या कच्च्या कैद्यांबद्दल  चिंता व्यक्त केली. सरन्यायाधीशांनी अनावश्यक अटक व जामीन मिळविण्यातील अडचण यांकडे लक्ष वेधले. 

कायदामंत्री : ‘आझादी का अमृत काल’मध्ये देशात ३.५ लाख कच्चे कैदी  आहेत. शक्य तितक्या लोकांना सोडा. भारत सरकारने कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरन्यायाधीश  : आमच्या फौजदारी न्यायप्रणालीमध्ये, प्रक्रिया ही शिक्षा आहे. तडकाफडकी व अनावश्यक अटकेपासून, जामीन मिळवण्यात अडचण येण्यापर्यंत, खटल्यांखालील प्रदीर्घ काळ तुरुंगवासाची प्रक्रिया याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी कायदा करण्याची गरज आहे.

कायदामंत्री : आपल्या देशात प्रलंबित प्रकरणांची संख्या ५ कोटींच्या वर पोहोचली आहे. २५ वर्षांनी काय परिस्थिती असेल? कायदामंत्री म्हणून लोक मला विचारतात. शनिवारी मी माझ्या विभागातील अधिकाऱ्यांशी बोललो की, दोन वर्षांत ही संख्या दोन कोटींनी खाली आणू.

सरन्यायाधीश : देशाबाहेर गेल्यावर  आम्हालाही हाच प्रश्न विचारला जातो.   खटला किती वर्षे चालतो? तुम्हा सर्वांना माहीत आहे की, न्यायालयीन रिक्त पदे न भरणे आणि न्यायालयीन पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न करणे हे प्रमुख महत्त्वाचे कारण आहे.

कायदामंत्री : श्रीमंत आणि साधनसंपन्न लोकांना चांगले वकील मिळतात. वकिलांकडून सुनावणीसाठी १०-१५ लाख आकारले जात असतील तर सर्वसामान्यांना ते परवडणार कसे? न्यायालये केवळ विशेष लोकांसाठी असू शकत नाहीत. न्यायाचे दरवाजे सर्वांसाठी सारखेच खुले असले पाहिजेत.

सरन्यायाधीश : गेल्या २७ वर्षांत अखिल भारतीय विधि सेवा प्राधिकरणाने ८० टक्के लोकसंख्येला   विधि सेवा प्राधिकरण  कायद्यांतर्गत लाभांचा दावा करण्यास सक्षम केले आहे. जगातील सर्वांत प्रगत लोकशाहीदेखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कायदेशीर मदत करीत नाहीत.

टॅग्स :N V Ramanaएन. व्ही. रमणा