शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पत्रकारांना केली शिविगाळ, म्हणाले, डोकं बिघडलंय का? ##, लाज वाटत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:42 IST

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा हा अडकण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पत्रकारांनी त्यावरून विचारलेल्या प्रश्नांमुळे Ajay Mishra Teni यांचा तोल ढळला असून, टेनी यांनी माध्यमांना शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे.

लखनौ - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. लखीमपूर-खेरी हिंसाचार प्रकरणामध्ये मुलगा आशिष मिश्रा मोनू याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा हा अडकण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पत्रकारांनी त्यावरून विचारलेल्या प्रश्नांमुळे अजय मिश्रा टेनी यांचा तोल ढळला असून, टेनी यांनी माध्यमांना शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे. माध्यमांवर संताप व्यक्त करताना टेनी यांनी ही शिविगाळ केली.

लखीमपूरमधील ओयल येथे मदर चाइल्ड केअरच्या ऑक्सिजन प्लॅटचे उदघाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी आले होते. तेव्हा त्यांना मुलगा आशिष मिश्रा याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, की हेच ## जे प्रसारमाध्यमवाले आहेत ना, एका निर्दोष व्यक्तीला त्यांनी फसवले आहे. किती वाईट लोक आहेत हे, यांना लाज वाटत नाही. हॉस्पिटल आहे, सर्व आहे. हे त्यांना दिसत नाही.

आज जेव्हा पत्रकारांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना एसआयटी रिपोर्टबाबत काही प्रश्न विचारले गेले. तेव्हा ते संतापले. ते म्हणाले. जाऊन एसआयटीला विचारा. हे तर तुमचे मीडियावाले आहेत ना. याच ##नी एका निर्दोष व्यक्तीला अडकवले आहे. लाज नाही वाटत. किती वाईट लोक आहेत हे. जाणून घेऊ इच्छिता, एसआयटीला विचारणार नाही का?

जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारावर हात उगारण्याचाही प्रयत्न केला. मात्र सोबर असलेल्या लोकांनी त्यांना रोखले. त्यानंतर अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारांना पुन्हा शिविगाळ केली.

लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्रा यांच्यासह सर्व १३ आरोपींच्या अडचणी वाढवल्या आहेत. तपास अधिकाऱ्याच्या अर्जावर कोर्टाने मंगळवारी सर्व आरोपींवर हत्या, सदोष मनुष्यवध आणि बेदरकारपणे वाहन चालवणे, अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. हे कलम हटवून एक मत होऊन हत्येचा प्रयत्न आणि परवान्याचा दुरुपयोग अशी कलमे लावण्यास मान्यता दिली आहे.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकार