शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पत्रकारांना केली शिविगाळ, म्हणाले, डोकं बिघडलंय का? ##, लाज वाटत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:42 IST

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा हा अडकण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पत्रकारांनी त्यावरून विचारलेल्या प्रश्नांमुळे Ajay Mishra Teni यांचा तोल ढळला असून, टेनी यांनी माध्यमांना शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे.

लखनौ - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. लखीमपूर-खेरी हिंसाचार प्रकरणामध्ये मुलगा आशिष मिश्रा मोनू याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा हा अडकण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पत्रकारांनी त्यावरून विचारलेल्या प्रश्नांमुळे अजय मिश्रा टेनी यांचा तोल ढळला असून, टेनी यांनी माध्यमांना शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे. माध्यमांवर संताप व्यक्त करताना टेनी यांनी ही शिविगाळ केली.

लखीमपूरमधील ओयल येथे मदर चाइल्ड केअरच्या ऑक्सिजन प्लॅटचे उदघाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी आले होते. तेव्हा त्यांना मुलगा आशिष मिश्रा याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, की हेच ## जे प्रसारमाध्यमवाले आहेत ना, एका निर्दोष व्यक्तीला त्यांनी फसवले आहे. किती वाईट लोक आहेत हे, यांना लाज वाटत नाही. हॉस्पिटल आहे, सर्व आहे. हे त्यांना दिसत नाही.

आज जेव्हा पत्रकारांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना एसआयटी रिपोर्टबाबत काही प्रश्न विचारले गेले. तेव्हा ते संतापले. ते म्हणाले. जाऊन एसआयटीला विचारा. हे तर तुमचे मीडियावाले आहेत ना. याच ##नी एका निर्दोष व्यक्तीला अडकवले आहे. लाज नाही वाटत. किती वाईट लोक आहेत हे. जाणून घेऊ इच्छिता, एसआयटीला विचारणार नाही का?

जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारावर हात उगारण्याचाही प्रयत्न केला. मात्र सोबर असलेल्या लोकांनी त्यांना रोखले. त्यानंतर अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारांना पुन्हा शिविगाळ केली.

लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्रा यांच्यासह सर्व १३ आरोपींच्या अडचणी वाढवल्या आहेत. तपास अधिकाऱ्याच्या अर्जावर कोर्टाने मंगळवारी सर्व आरोपींवर हत्या, सदोष मनुष्यवध आणि बेदरकारपणे वाहन चालवणे, अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. हे कलम हटवून एक मत होऊन हत्येचा प्रयत्न आणि परवान्याचा दुरुपयोग अशी कलमे लावण्यास मान्यता दिली आहे.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकार