शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पत्रकारांना केली शिविगाळ, म्हणाले, डोकं बिघडलंय का? ##, लाज वाटत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:42 IST

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा हा अडकण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पत्रकारांनी त्यावरून विचारलेल्या प्रश्नांमुळे Ajay Mishra Teni यांचा तोल ढळला असून, टेनी यांनी माध्यमांना शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे.

लखनौ - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. लखीमपूर-खेरी हिंसाचार प्रकरणामध्ये मुलगा आशिष मिश्रा मोनू याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा हा अडकण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पत्रकारांनी त्यावरून विचारलेल्या प्रश्नांमुळे अजय मिश्रा टेनी यांचा तोल ढळला असून, टेनी यांनी माध्यमांना शिविगाळ केल्याची घटना समोर आली आहे. माध्यमांवर संताप व्यक्त करताना टेनी यांनी ही शिविगाळ केली.

लखीमपूरमधील ओयल येथे मदर चाइल्ड केअरच्या ऑक्सिजन प्लॅटचे उदघाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी आले होते. तेव्हा त्यांना मुलगा आशिष मिश्रा याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, की हेच ## जे प्रसारमाध्यमवाले आहेत ना, एका निर्दोष व्यक्तीला त्यांनी फसवले आहे. किती वाईट लोक आहेत हे, यांना लाज वाटत नाही. हॉस्पिटल आहे, सर्व आहे. हे त्यांना दिसत नाही.

आज जेव्हा पत्रकारांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना एसआयटी रिपोर्टबाबत काही प्रश्न विचारले गेले. तेव्हा ते संतापले. ते म्हणाले. जाऊन एसआयटीला विचारा. हे तर तुमचे मीडियावाले आहेत ना. याच ##नी एका निर्दोष व्यक्तीला अडकवले आहे. लाज नाही वाटत. किती वाईट लोक आहेत हे. जाणून घेऊ इच्छिता, एसआयटीला विचारणार नाही का?

जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारावर हात उगारण्याचाही प्रयत्न केला. मात्र सोबर असलेल्या लोकांनी त्यांना रोखले. त्यानंतर अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारांना पुन्हा शिविगाळ केली.

लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्रा यांच्यासह सर्व १३ आरोपींच्या अडचणी वाढवल्या आहेत. तपास अधिकाऱ्याच्या अर्जावर कोर्टाने मंगळवारी सर्व आरोपींवर हत्या, सदोष मनुष्यवध आणि बेदरकारपणे वाहन चालवणे, अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. हे कलम हटवून एक मत होऊन हत्येचा प्रयत्न आणि परवान्याचा दुरुपयोग अशी कलमे लावण्यास मान्यता दिली आहे.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकार