शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Corona Vaccination : 5 ते 15 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 17:23 IST

Corona Vaccination : भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते.

गांधीनगर : पाच ते 15 वयोगटातील मुलांना कोरोना लसीचे डोस देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी भाष्य केले. ते म्हणाले की, तज्ज्ञांच्या समूहाने शिफारस केल्यावर सरकारकडून या वयोगटासाठी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येईल. मात्र, तज्ज्ञांच्या समूहाकडून  याबाबत अद्याप कोणतीही शिफारस केलेली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ही माहिती दिली. भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, 'कोणत्या वयोगटात, कधीपासून लसीकरण सुरू करायचे, हे तज्ज्ञांच्या समूहाच्या शिफारशींच्या आधारे ठरवले जाते. या तज्ज्ञांच्या समूहाकडून मुलांसाठी शिफारस प्राप्त होताच आम्ही त्याची तात्काळ अंमलबजावणी करू.'

दरम्यान, देशात गेल्या महिन्यात 15 ते 18 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले.  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, 'आज लसीकरण हा मुद्दा नाही. आमच्याकडे पुरेशा लसी आहेत, डोसची कमतरता नाही. आम्ही निश्चितपणे तज्ज्ञांच्या समूहाच्या शिफारसींचे पालन करू. महामारीच्या तिसऱ्या लाटेत भारताने कोरोनाविरुद्धच्या युद्धात लसीकरणाचा प्रभावीपणे वापर केला आहे.'

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. त्या अंतर्गत 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य