शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Corona Vaccination : 5 ते 15 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 17:23 IST

Corona Vaccination : भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते.

गांधीनगर : पाच ते 15 वयोगटातील मुलांना कोरोना लसीचे डोस देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी भाष्य केले. ते म्हणाले की, तज्ज्ञांच्या समूहाने शिफारस केल्यावर सरकारकडून या वयोगटासाठी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येईल. मात्र, तज्ज्ञांच्या समूहाकडून  याबाबत अद्याप कोणतीही शिफारस केलेली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ही माहिती दिली. भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, 'कोणत्या वयोगटात, कधीपासून लसीकरण सुरू करायचे, हे तज्ज्ञांच्या समूहाच्या शिफारशींच्या आधारे ठरवले जाते. या तज्ज्ञांच्या समूहाकडून मुलांसाठी शिफारस प्राप्त होताच आम्ही त्याची तात्काळ अंमलबजावणी करू.'

दरम्यान, देशात गेल्या महिन्यात 15 ते 18 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले.  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, 'आज लसीकरण हा मुद्दा नाही. आमच्याकडे पुरेशा लसी आहेत, डोसची कमतरता नाही. आम्ही निश्चितपणे तज्ज्ञांच्या समूहाच्या शिफारसींचे पालन करू. महामारीच्या तिसऱ्या लाटेत भारताने कोरोनाविरुद्धच्या युद्धात लसीकरणाचा प्रभावीपणे वापर केला आहे.'

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. त्या अंतर्गत 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य