शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

केंद्र सरकार आणखी एक मोठं गिफ्ट देणार; लवकरच करणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 09:00 IST

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेबरोबर सामान्य लोकांच्या मदतीसाठीही पाऊल उचललेले आहे.

नवी दिल्लीः  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कामधंदे ठप्प असल्यानं अनेकांना पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे गृह, वाहन किंवा अन्य हप्ते कसे फेडायचे याचीच चिंता सामान्यांना सतावते आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारामण यांनी दिलासादायक घोषणा केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आणखी एक पॅकेज घोषित करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसनं पूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे काही जणांचा पगारही होत नसून अनेक व्यवसाय बंद असल्यानं रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी गरीबांसह उद्योगांसाठी लवकरच आणखी एक आर्थिक पॅकेज जाहीर केले जाईल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी जागतिक बँकेच्या बैठकीत दिली आहे. तसेच गरजवंत देशांना औषधांचा पुरवठा देखील केला जाईल, असं निर्मला सीतारामन यांनी व्हिडिओ कन्फरन्सिंद्वारे झालेल्या बैठकीत सांगितले.

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेबरोबर सामान्य लोकांच्या मदतीसाठीही पाऊल उचललेले आहे. मागील महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सरकारने आतापर्यंत समाजातील विविध वर्गांसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार