शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' संस्था स्थापन करणार, मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 16:39 IST

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हे व्यासपीठ सुरू होणार आहे, असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले.

नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाने तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' संस्था तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात १५ ते १९ वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुण आहेत. या तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' (MyBharat) नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील तरुणांना त्यांची जबाबदारी समजते. पंचप्राणमधील कर्तव्याच्या भावनेबद्दलही भाष्य पंतप्रधान करत असतात, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सर्वात मोठी लोकसंख्या तरुणांची आहे. १५ ते १९ वयोगटातील ४० कोटी तरुण आहेत. ही भारताची मोठी ताकद आहे. 'मेरा युवा भारत' नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या क्षेत्रात कोणाला योगदान द्यायचे असेल तर या व्यासपीठाचा मोठा आधार असेल. देशातील कोट्यवधी तरुणांनी यात सहभागी होऊन योगदान द्यावे, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. म्हणजेच सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हे व्यासपीठ सुरू होणार आहे, असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले.

स्वच्छ भारतने ७५ लाख किलो प्लास्टिक गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते, त्यानंतर आमच्या तरुणांनी १०० लाख किलो प्लास्टिकचे लक्ष्य गाठले. याअंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची चर्चा आहे. भारताला विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी 'मेरा युवा भारत' प्रभावी ठरेल. युवा संवाद, युवा संसद, सांस्कृतिक कार्यक्रम, देवाणघेवाण कार्यक्रम अशा कामांसाठी हे व्यासपीठ प्रभावी ठरेल, असे अनुराग ठाकुर म्हणाले.

तसेच, कोविडच्या काळातही तरुणांनी उत्स्फूर्तपणे योगदान आणि सहकार्य केले आहे. तरुणांमध्ये सेवा आणि कर्तव्याची भावना आणि स्वावलंबी भारत बनवण्याची ध्यास असेल तर ते येत्या २५ वर्षांत भारताला विकसित भारत बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकतात, असेही अनुराग ठाकुर यांनी सांगितले.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरNarendra Modiनरेंद्र मोदी