शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Union Budget 2022 : 'MSP हमी कायदा झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदा होईल'; अर्थसंकल्पानंतर राकेश टिकैतांचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:07 IST

Union Budget 2022 : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमएसपी हमी कायदा लागू झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदा होईल, असे राकेश टिकैत म्हणाले.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. दरम्यान, देशाच्या विविध भागातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री शेतीक्षेत्राबाबत काय घोषणा करतात, याकडे कृषीक्षेत्रातील जाणकारांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमएसपी हमी कायदा लागू झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदा होईल, असे राकेश टिकैत म्हणाले.

उसाच्या थकबाकीबाबत राकेश टिकैत म्हणाले की, ऊस कायद्यानुसार 14 दिवसांत पैसे न दिल्यास व्याज देण्याची तरतूद आहे, मात्र पैसे मिळत नाहीत. यूपीमध्ये पाच वर्षे भाजपाचे सरकार आहे, पण तरीही ते झाले नाही. मार्च महिन्यापासून देयके बाकी आहेत. त्याचबरोबर एमएसपी हमी कायदा कायदा झाल्यावरच शेतकऱ्यांना एमएसपीवर खरेदीचा फायदा होईल. तेव्हाच स्वस्तात कोणताही व्यापारी खरेदी करू शकणार नाही आणि त्यानंतर व्यापारी एमएसपीवर विकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

दरम्यान, राकेश टिकैत हे एमएसपीवर कायदा आणण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी करत आहेत. कृषीविषयक तीन कायदे रद्द केल्यानंतरही राकेश टिकैत हे सरकारवर जोरदार प्रहार करत आहेत. जोपर्यंत एमएसपीचा कायदा येत नाही, तोपर्यंत धान्य खरेदीत फसवणूक होईल. यामुळे शेतकऱ्यांऐवजी फक्त व्यापारी, अधिकारी आणि राजकारण्यांना याचा फायदा होत राहील, असे ते म्हणाले.

याचबरोबर, सरकारने या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनला चालना देण्याबाबतही म्हटले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून याबाबत वकिली करत आहोत, असे म्हणत राकेश टिकैत यांनी याबाबत केंद्र सरकारला टोला लगावला. तसेच,  शेतकऱ्यांची थकबाकीही डिजीटल करून डिजिटल पद्धतीने भरावी, अशी आमची मागणी आहे. तसेच 23 धान्य डिजिटलने जोडली पाहिजेत, असे राकेश टिकैत म्हणाले. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतBudgetअर्थसंकल्प 2022Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनagricultureशेतीFarmerशेतकरी