शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

Union Budget 2022 : 'MSP हमी कायदा झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदा होईल'; अर्थसंकल्पानंतर राकेश टिकैतांचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:07 IST

Union Budget 2022 : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमएसपी हमी कायदा लागू झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदा होईल, असे राकेश टिकैत म्हणाले.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. दरम्यान, देशाच्या विविध भागातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री शेतीक्षेत्राबाबत काय घोषणा करतात, याकडे कृषीक्षेत्रातील जाणकारांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमएसपी हमी कायदा लागू झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदा होईल, असे राकेश टिकैत म्हणाले.

उसाच्या थकबाकीबाबत राकेश टिकैत म्हणाले की, ऊस कायद्यानुसार 14 दिवसांत पैसे न दिल्यास व्याज देण्याची तरतूद आहे, मात्र पैसे मिळत नाहीत. यूपीमध्ये पाच वर्षे भाजपाचे सरकार आहे, पण तरीही ते झाले नाही. मार्च महिन्यापासून देयके बाकी आहेत. त्याचबरोबर एमएसपी हमी कायदा कायदा झाल्यावरच शेतकऱ्यांना एमएसपीवर खरेदीचा फायदा होईल. तेव्हाच स्वस्तात कोणताही व्यापारी खरेदी करू शकणार नाही आणि त्यानंतर व्यापारी एमएसपीवर विकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

दरम्यान, राकेश टिकैत हे एमएसपीवर कायदा आणण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी करत आहेत. कृषीविषयक तीन कायदे रद्द केल्यानंतरही राकेश टिकैत हे सरकारवर जोरदार प्रहार करत आहेत. जोपर्यंत एमएसपीचा कायदा येत नाही, तोपर्यंत धान्य खरेदीत फसवणूक होईल. यामुळे शेतकऱ्यांऐवजी फक्त व्यापारी, अधिकारी आणि राजकारण्यांना याचा फायदा होत राहील, असे ते म्हणाले.

याचबरोबर, सरकारने या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनला चालना देण्याबाबतही म्हटले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून याबाबत वकिली करत आहोत, असे म्हणत राकेश टिकैत यांनी याबाबत केंद्र सरकारला टोला लगावला. तसेच,  शेतकऱ्यांची थकबाकीही डिजीटल करून डिजिटल पद्धतीने भरावी, अशी आमची मागणी आहे. तसेच 23 धान्य डिजिटलने जोडली पाहिजेत, असे राकेश टिकैत म्हणाले. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतBudgetअर्थसंकल्प 2022Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनagricultureशेतीFarmerशेतकरी