शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणतात, होत असलेला विरोध केवळ राजकीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 08:12 IST

आंदोलकांची पोलिसांशी झटापट; केंद्राचे संघटनांना पत्र

एस.के. गुप्तानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गुरुवारी पंजाबहून दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब-हरयाणा सीमेवर अडवण्यात आले. शेतकऱ्यांनी उग्र प्रदर्शन केल्यावर त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पंजाबच्या या शेतकऱ्यांचे हे वर्तन राजकारणाने प्रेरित असल्याचे म्हटले. तोमर म्हणाले, नव्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांचे हित जपले आहे. मंडयांत त्यांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी आणि आपले पीक एमएसपीपेक्षाही जास्त भावाने विकण्याची पूर्ण संधी त्यांना दिली गेली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडेय यांनी पंजाबमधील ३२ शेतकरी संघटनांना पत्र लिहून नव्या कृषी सुधारणा कायद्यांतील शंका दूर करण्यासाठी चर्चेला निमंत्रित केले आहे. शेतकरी नेत्यांची ही चर्चा मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत  होईल. तोमर म्हणाले की, राज्यांना हवे असेल, तर ते त्यांच्याकडील मागणीनुसार राज्याच्या कृषी कायद्यांत दुरुस्ती करून एमएसपीची तरतूद करू शकतात. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी बोलायला मी तयार आहे. देशात शेतकरी केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी सुधारणा कायद्यांना विरोध करीत नाहीत. हा विरोध विरोधी पक्षांकडून होत आहे. कारण एमएसपी जुन्या किंवा नव्या कृषी कायद्यात लिहिली गेली आहे, असेही तोमर म्हणाले.सरकार अधिकृत निवेदनात एमएसपी कायम राखून मंडया बंद न होण्याचे आश्वासन देत आहे. 

शेतकऱ्यांचे आंदोलन यासाठी...n एमएसपी संपण्याची भीती. कारण मंडईच्या बाहेर पीक विकण्याचा मार्ग मोकळा केला गेला.n सरकारने विधेयकात मंडया संपवण्यात येईल, असे म्हटलेले नाही.n विना कर शेतकरी मंडईच्या बाहेर जेव्हा पीक विकेल तेव्हा मंडईची गरज संपून जाईल. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना विनामंडई एमएसपी कशी मिळेल? - शेतकरी असा युक्तिवाद करीत आहेत की, अडते किंवा व्यापारी त्यांचे ६-७ टक्के कराचे नुकसान न करता मंडईतून बाहेर खरेदी करतील. यामुळे शेतकऱ्यांचे शोषण वाढेल.n कंत्राटी शेतीत शेतकऱ्यांचा कोर्टात जाण्याचा हक्क काढून घेण्यात आला आहे. कंपन्या आणि शेतकरी यांच्यातील वादावर एसडीएम निर्णय घेईल.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्रीFarmerशेतकरी