शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"जे इस्लाममध्ये जन्माला आले नाहीत ते दुर्दैवी’’,  ममता बॅनर्जींच्या मंत्र्याच्या अजब दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 15:59 IST

West Bengal News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या फिरहाद हकीम यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या फिरहाद हकीम यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. जुलै महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय कुराण स्पर्धेमध्ये संबोधित करताना हकिम यांनी ‘’जे लोक इस्लाममध्ये जन्माला येत नाहीत, ते दुर्दैवी आहेत. तसेच ते दुर्दैव घेऊन जन्माला येतात. त्यांना इस्लामच्या चौकटीत आणलं पाहिजे’’, असं विधान केलं होतं. 

या विधानावरून वाद झाल्यानंतर हकीम यांनी सारवासारव करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असा दावा केला आहे. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुस्लिम आहे. मात्र नियमितपणे दूर्जा पूजा आणि कालीपूजेचं आयोजन करतो, असं त्यांनी सांगितलं.  हकीम यांनी जुलै महिन्यात केलेल्या केलेल्या या विधानाला भाजपाच्या आमदारांनी तीव्र विरोध केला होता. हकीम विधानसभेमध्ये जेव्हा आपली बाजू मांडण्यासाठी उभे राहिले. तेव्हा भाजपाच्या आमदारांनी त्यांचा निषेध करून सभात्याग केला.

यावेळी हकीम म्हणाले की, जेव्हा मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उभा राहतो, तेव्हा विरोधी पक्षाचे आमदार सभागृहातून बाहेर पडतात, हे पाहणं दुर्दैवी आहे. जर माझ्या कुठल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असेल, तर मी काय करू शकतो. इथे उपस्थित असलेले भाजपाचे नेते डॉ. शंकर घोष यांच्यासह उपस्थित असलेले लोक मला धर्मनिरपेक्ष मानतात की नाही, हे सांगू शकतात का. मी धर्मनिरपेक्ष आहे, हे सर्वांना माहिती आहे. या सभागृहाबाहेर एखा कार्यक्रमामध्ये केलेल्या माझ्या विधानावरून राजकारण करणं योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

मी कधीही कुठल्याही अन्य धर्माच्या लोकांना अपमान केलेला नाही. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत मी तसं करणार नाही. मी परधर्मीय लोकांचा सन्मान करतो. मी इस्लामचा अनुयाई आहे. मात्र मी नियमितपणे दूर्गापूजा आणि कालीपूजेचं आयोजन करतो, असेही हकीम यांनी सांगितले. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी  म्हणाले की, त्या समारंभामध्ये तुम्हाला महापौर आणि मंत्री म्हणून निमंत्रित करण्यात आलं होत. तुम्ही तिथे जे काही बोललात, ते मी सांगत नाही आहे. तुमच्या भाषणाचा पहिला भाग योग्य होता. मात्र दुसऱ्या भागात तुम्ही इतर धर्माच्या लोकांना त्या धर्मात दाखल होण्यास सांगितलं ज्या धर्माचं पालन तुम्ही करता. तुम्ही आमची माफी मागावी असं मी सांगणार नाही. मात्र ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांची तुम्ही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी शुभेंदू अधिकारी यांनी केली.   

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाIslamइस्लामHinduहिंदू